धनगर समाजाला ‘चंदन’ लावण्याचे काम तर थोरात आणि त्यांच्या राष्ट्रवादीनेच केलं, हिम्मत असेल तर…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यतील धनगर समाजाला आणि त्यातील घटकांना जर खऱ्या अर्थाने कुणी चंदन लावला असेल तर तो दौंडचे माजी आमदार रमेश थोरात आणि राष्ट्रवादिनेच लावला असून थोरात आणि राष्ट्रवादीने वेळोवेळी धनगर समाजाचा फक्त वापरच केला आहे असा हल्ला भीमा पाटस कारखाण्याचे मा.संचालक आणि धनगर समाजाचे नेते लक्ष्मण रांधवन यांनी चौफुला येथे केला.

रांधवन यांनी चौफुला येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना आपण रमेश थोरात यांना विचारू इच्छितो की तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला जर खरेच धनगर समाजाची इतकी तळमळ होती तर यावेळी धनगर समाजाचे नेते आनंद थोरात हे विधानसभेसाठी इच्छुक असताना तुम्ही पाठिंबा देऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर करायला काय हरकत होती?? आणि तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जर धनगर समाजाबद्दल प्रेम आहे तर मग अजूनही तुम्ही माघार घेऊन आनंद थोरतांचे काम करणार का?? आनंद थोरात यांना जर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तर अमच्यासह तालुक्यातील संपूर्ण धनगर समाज हा राष्ट्रवादीच्या मागे उभा राहील पण थोरात साहेब तुम्ही यासाठी तयार आहात का?? की फक्त राजकीय मुद्द्यांसाठीच तुम्हाला आमचा धनगर समाज दिसतो असा हल्ला चढवला.

पूढे बोलताना त्यांनी तर सुभाष अण्णांच्या काळात ज्यावेळी सुभाष अण्णा धनगर समाजाचे नेते आनंद थोरात किंवा माळी समाजाचे नेते महेश भागवत यांना जिल्हा बँकेची उमेदवारी द्या म्हणून विनंती करत होते त्यावेळी तुम्ही या दोघांपैकी एकालाही उमेदवारी का दिली नाही असा प्रश्नही उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुटप्पीपणाचा त्यांनी खरपूस समाचार घेताना आमच्यातील एक पक्ष निरीक्षक बापू सोलनकर हे बारामतीतून दौंडमध्ये येऊन धनगर बांधवांना राष्ट्रवादीला मतदान करा म्हणून सांगत आहेत पण सोलनकर यांना आपल्या धनगर समाजाचे बद्दल थोडी जरी आस्था असेल तर त्यांनी आपल्या समाजाचे नेते पडळकरांचा अगोदर बारामतीमध्ये प्रचार करावा आणि आपल्या समाजाप्रती प्रेम भावना दाखवून द्यावी आणि नंतर दौंड तालुक्यात येऊन सांगावे असे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कर्जत तालुक्यामध्ये धनगर समाजाचे नेते आणि ज्यांना भाजप ने कॅबिनेट मंत्री केले असे राम शिंदे यांच्या विरोधात स्वतःचा नातू रोहित पवार यांना उभे केले आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातील धनगर समाजाचा व्यक्ती मंत्री झाला हे यांना रुचत नाही हेच सिद्ध केले आहे त्यामुळे त्यांनी शिंदे यांना पाडण्यासाठी आपली संपूर्ण ताकद तेथे लावलेली आहे मग तुमचे धनगर समाजबद्दलचे प्रेम फक्त दौंड पुरतेच मर्यादित आहे का असा प्रश्न उपस्थित केला आणि धनगर समाजाचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांना मात्र पाडण्यासाठी लावलेली संपूर्ण ताकद हे कशाचे उदाहरण आहे आणि मग कोण कुणाला चंदन लावत आहे हे आता समाजालाही समजले आहे त्यामुळे धनगर समाज असल्या भूल थापांना अजिबात बळी पडणार नाही तो फक्त राहुल कुल यांच्याच पाठीशी उभा असेल असा विश्वास व्यक्त केला.

Visit : Policenama.com