दौंडकरांनो तुम्ही मला ‘आमदार’ द्या, मी तुम्हाला ‘मंत्रिपद’ देणारच : मुख्यमंत्री फडणवीस
दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्याला वेळोवेळी मंत्रिपदाची हुलकावणी मिळाली आहे पण यावेळी असे होणार नाही कारण तुम्ही राहुलदादा ला आमदार म्हणून मुंबईला पाठवा मी दादाला मंत्री करून तुमच्याकडे पाठवतो अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दौंड तालुक्यातील चौफुला येथे घेण्यात आलेल्या सभेत दिली. ते भाजप शिवसेना रासप महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली सभेत बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टिकेची झोड उठवताना पवार साहेबांची सध्या राज्यमध्ये शोलेतल्या जेलर सारखी अवस्था झाली असून आधे इधर जावो आधे उधर जावो बाकी मेरेपीछे आवो अशी असून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दाखवायलाही पहिलवान उरलेला नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना स्वतःलाच जायला लागत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील विकासाबाबत बोलताना त्यांनी तुम्ही 15 वर्षे सत्तेत होताना तर मग तुम्ही तुमचा 15 वर्षाचा हिशोब ठेवा आम्ही आमचा 5 वर्षाचा हिशोब तुमच्यासमोर मांडतो, जर तुमच्यापेक्षा दुप्पट विकासकामे केली नसतील तर निवडणूक लढवणार नाही असे आव्हान देत 15 वर्षात तुम्ही शेतकऱ्याला 20 हजार कोटी दिले मात्र आमच्या 5 वर्षात 50 हजार कोटी शेतकऱ्यांना दिल्याचे सांगितले.
दौंड आणि परिसराच्या विकासाबाबत त्यांनी बोलताना ज्यामुळे दौंड, बारामती आणि इंदापुरचे भाग्य बदलणार आहे ते टाटाचे मुळशीचे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यांना देणारच असून चौफुला येथेही आम्ही MIDC आणत असून यामुळे सर्व स्थानिक युवकांना नोकऱ्या मिळतील असे आश्वासन दिले.
दौंड च्या इतर प्रश्नांबाबत बोलताना दौंडच्या अष्टविनायक मार्गाचे लवकरच काम पूर्ण होईल, पुणे दौंड लोकलचे सर्व काम पूर्ण करून येत्या एक वर्षात दौंड पुणे दौंड लोकल सुरू करण्यात येईल असे सांगितले आणि भीमा पाटस कारखाना मुद्दाम बंद पाडण्याचे जे षडयंत्र विरोधकांनी आखले आहे ते कदापि पूर्ण होऊ देणार नाही संपूर्ण ताकदीनिशी आम्ही राहुल कुल यांच्या पाठीशी उभे राहून तो चालूच ठेऊ असे सांगितले. धनगर आरक्षण आम्हीच देऊ असे म्हणत धनगर समाजाला आम्ही 1 हजार कोटी दिले आहेत त्यामुळे धनगर बांधवांच्या सर्व समस्या लवकरच दूर होतील असे सांगितले. शेवटी त्यांनी जे बारामतीकर राहुल कुल यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत ते त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही कारण त्यांच्या मागे सर्व जनता उभी आहे आणि आमची साथ असल्याचे सांगितले.
आमदार राहुल कुल यांनी बोलताना दौंड तालुक्याला १४०० कोटींचा मोठा विकास निधी मिळून कामेही पूर्ण झाली आहेत असे सांगत मी वारंवार विरोधकांना आव्हान करूनही विरोधक मात्र याबाबत समोरा समोर कधीच एके नाहीत यावरूनच आपण केलेली कामे ही त्यांनाही मान्य असून फक्त विरोधासाठी विरोध करायचा म्हणून ते विरोध करत असल्याचे सांगितले. या कर्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी किसन सेलचे अध्यक्ष माऊली शेळके, तसेच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य व विविध संघटनांनी आमदार राहुल कुल यांना पाठिंबा दिला.
Visit : Policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी