माझ्या कवितेचा अर्थ चुकीचाच घेतला जात आहे: दीपक मन्वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मन्वरांची ‘पाणी कसं असतं’ ही कविता काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काही आक्षेपांमुळे वगळली गेली. यावर स्पष्टीकरण देणारं निवेदन मन्वरांनी नुकतंच जाहीर केले की, ‘माझ्या ‘पाणी कसं असतं’ या कवितेचा चुकीचा अर्थ घेतला जात असून तो मला कवी म्हणून तर काय माणूस म्हणून ही अभिप्रेत नाही.’ असा खुलासा दीपक मन्वर यांनी केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’832e6b0a-c964-11e8-8678-bb549f9e70df’]

मन्वर यांचा ‘दृष्य नसलेल्या दृष्यात’ हा काव्यसंग्रह यंदा मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या मराठी तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात घेण्यात आला होता. या काव्यसंग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेत आदिवासी स्त्रीयांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. तसेच ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणीही या संघटनांनी केली होती.

त्यानुसार ही कविता मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमातून सुध्दा वगळून टाकली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयावर साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सडकून टीका केली. या सगळ्या वादावर पडदा टाकण्यासाठी खुद्द दीपक मन्वरांनी आता समोर आले आहे.  आपल्या  निवेदनात मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या असं म्हणत त्यांनी  आदिवासी समाजाची माफी देखील मागितली आहे.

 ‘आदिवासी’ हा जातीवाचक शब्द नाहीच –

 

‘पाणी कसं असतं’ या कवितेत पाण्याला आदिवासी स्त्रीयांच्या वक्षस्थळाची उपमा देण्यात आली असल्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. अनेक आदिवासी संघटनांनी ती अभ्यासक्रमात घेण्याचा विरोध केला. त्यावर खुलासा करताना या कवितेत आदिवासी हा जातीवाचक शब्द नसल्याचे मन्वरांनी सांगितलं आहे.

दिवाळीनिमित्त एसटीच्या ९ हजार ३०० जादा गाड्या

‘मला जातीबद्दल लिहायचं असतं तर मी भिल्ल,ठकार,गोंड असे शब्द लिहू शकलो असतो. पण कवितेतील आदिवासी हा शब्द मुळात जातीवाचक नसून त्याचा अर्थ मुळचे,पहिले रहिवासी असा आहे.’ जगण्याच्या संवेदनांची आदिवासींच्या मुक्त जीवनशैलीशी तुलना या कवितेत केली असल्याचे मन्वर यांचे म्हणणे आहे. तसेच या तुलनेचा विश्वसृजनाच्या कल्पनेशी संबंध असल्यामुळे आदिवासी समाजाच्या स्त्रीयांबद्दल या कवितेत काहीच आक्षेपार्ह नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e9103d51-c967-11e8-8278-0f768d43d18d’]

कवितेसोबत माझेपूर्ण काव्यसंग्रहच अभ्यासक्रमातून काढा…. 

फक्त पाणी कसं असतं ही कविताच वगळू नका तर ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ हा काव्यसंग्रहच अभ्यासक्रमातून मुंबई विद्यापीठाने वगळावा अशी मागणी दीपक मन्वरांनी केली आहे. आपल्या कवितेतील ओळीमुळे आदिवासी बांधवांना खूप त्रास झाला म्हणून मन्वरांना दु:ख झाले आहे.या त्रासासाठी माफी मागत हा काव्यसंग्रहच अभ्यासक्रमातून वगळून टाकावा अशी विनंती विद्यापीठाला मन्वरांनी या निवेदनात केली आहे.