औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांच्यावर अब्दुल रहमान अंजरिया यांनी ३५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. लक्ष्मण माने यांनी आपल्यावर खोटे आणि तथ्यहीन आरोप केल्याचा दावा करून त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी अशी मागणी अंजरिया यांनी केली आहे. अंजरिया हे आरएसएसमध्ये होते. त्यांनी भाजपमध्ये काम केले होते. असा आरोप काही दिवसांपूर्वी लक्ष्मण माने यांनी केला होता.
तसेच वंचितच्या तिकीटावर अंजरिया यांनी निवडणूक लढवली यावर देखील माने यांनी आक्षेप घेतला होता. लक्ष्मण माने यांनी केलेले आरोप तथ्यहिन असल्याचा दावा अंजरिया यांच्या वकीलांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनतर लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. तसेच आंबेडकर यांच्या कार्य़पद्धतीवर आक्षेप घेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली होती.
वंचित बहुजन आघाडी आता वंचितांचा पक्ष राहिला नसून त्यात भाजप आणि संघाचे लोक घुसल्याचा आरोप माने यांनी पडळकरांवर केला होता. त्यानंतर अंजरिया यांच्यावर माने यांनी टीका केली होती.
- पुरुषांनी कधीही खाऊ नयेत ‘हे’ १२ पदार्थ, ‘सेक्स पॉवर’ होते कमी
- फुलकोबीचे ‘हे’ ७ फायदे अनेकांना माहित नसतात, जाणून घ्या
- होय ! फेंगशुईच्या मदतीने वजन होऊ शकते कमी, जाणून घ्या खास उपाय
- गवारीची भाजी ‘या’ आजारांवरही ‘ही’ उपयुक्त, जाणून घ्या १० फायदे
- ‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
- तोंड आल्यानंतर ‘हे’ घरगुती उपाय करा, आहेत त्याचे २० फायदे, जाणून घ्या
- ‘या’ तेलाने दूर होऊ शकतो बहिरेपण आणि टक्कल, वाचा इतर ८ फायदे
- अंगणातील ‘ही’ वनस्पती मलेरियावर रामबाण औषध, जाणून घ्या ११ उपाय
- ४० ते ४५ टक्के लोक पोटाच्या विकाराने ग्रस्त, काळजी कशी घ्यावी जाणून घ्या
- जादा टॉपिंग पिझ्झा हृदयासाठी धोकादायक ! हे आहेत ६ वाईट परिणाम
- ‘या’ रोपाचे ८ फायदे ! शांत लागते झोप, मुळव्याधीतही मिळतो आराम