मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका ; ते पंतप्रधान पदाची संगीत खुर्ची खेळत आहेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभेची निवडणूक हि ऐतिहासिक निवडणूक आहे. हि भाजपसाठीची निवडणूक नसून ती देशासाठीची निवडणूक आहे. मुंबईतील भाजपच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले आहेत. याच प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर हि या कार्यक्रमात निशाणा साधला आहे. ज्यांना आपल्या पक्षाचे कधी दोन आकडी खासदार निवडून आणता आले नाहीत ते पंतप्रधान पदाची संगीत खुर्ची खेळत आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणले आहेत.

देशात २०१९ ला भाजप सरकार येणे भाजपसाठी नाही तर देशाच्या हिताचे असणार आहे. देशात जर महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेत आले तर देशाची अवस्था काय होईल असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. २००९ ते २०१४ या कालावधीतल्या प्रमाणे देशात निर्णय नघेणारे सरकार सत्तेत आले तर देश पुढचे पाच वर्ष नव्हे तर ५० वर्ष मागे जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. २०१९ ला जनतेने भाजपला पराभूत केले तर ती ऐतिहासिक चूक असेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबई शहरावर मागील अकार्यक्षम सरकारमुळे दुर्दशेची वेळ आली आहे. दिल्लीच्या मेट्रो अगोदर मुंबईची मेट्रो व्हायला पाहिजे होती मात्र येथील उदासीन सरकारने विकास कामे रखडवण्याचे काम केले त्यामुळे मुंबई शहराचा विकास थांबला आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.