नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सहा दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
दिल्ली में तेज़ी से बढ़ते कोरोना मामलों के मद्देनज़र एक महत्वपूर्ण घोषणा | Press Conference | LIVE https://t.co/zAECIEcZ53
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 19, 2021
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘आपण दिल्लीमध्ये आतापर्यंत परिस्थिती चांगली हाताळली आहे. कोणत्याही यंत्रणेच्या आपल्या मर्यादा आहेत. दिल्लीमध्ये आणखी रुग्णांना दाखल करून घेणे शक्य नाही आणि लॉकडाऊनला पर्याय नाही असे लक्षात आले आहे. त्यानुसार, आज रात्री दहा ते पुढील सोमवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. या कालावधीत मेडिकल, खाण्यापिण्याची दुकाने सुरू राहतील. तसेच काय सुरू राहणार व काय बंद यासंबंधी सविस्तर माहिती लवकरच जाहीर करू’.
It has been decided to impose a lockdown in Delhi, from 10 pm tonight to 6 am next Monday (26th April): Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/hBB2qXpxpM
— ANI (@ANI) April 19, 2021
दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत 100 पेक्षा कमी आयसीयू बेड्स आहेत. ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. एका खासगी रुग्णालयाने तर रात्री तीन वाजता ऑक्सिजन संपला होता असे सांगितले. मात्र, वेळीच उपलब्ध झाल्याने खूप मोठी दुर्घटना टळली. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टी पाहता दिल्लीमध्ये परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळेच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
आम्ही खोटं बोललो नाही
आम्ही चाचण्या कमी केल्या नाहीत तर वाढवल्या. दिल्लीत रोज एक लाख चाचण्या होत आहेत. आम्ही मृत्यूचे आकडेही लपवले नाहीत. आम्ही आत्तापर्यंत कधीही खोटं बोललो नाही. जी परिस्थिती आहे ती नेहमीच जनतेसमोर ठेवली. दिल्लीत गेल्या 24 तासांत 23,500 रुग्ण आढळले आहेत. दिवसाला 25 हजार रुग्ण मिळत असतील तर आरोग्य व्यवस्था ढासळेल, असेही केजरीवाल यांनी सांगितले.