यावेळी बोलताना नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्न उपस्थित करत अरविंद केजरीवाल म्हणाले की, “गेल्यावेळी तुम्ही बारावी पास व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडले. आता या चुकीची पुनरावृत्ती करु नका. यावेळी एखाद्या सुशिक्षित व्यक्तीस पंतप्रधानपदी संधी द्या. पंतप्रधानपद अत्यंत महत्त्वाचे पद आहे. बारावी पास व्यक्तीला हस्ताक्षर कुठे करायचे हेच समजत नाही’’.
केजरीवाल यांनी राफेलच्या मुद्द्यावरूनही मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मोदी सरकारच्या काळातील राफेल करारात विमानांसाठी जास्त पैसे द्यावे लागले. यासाठी मोदीच जबाबदार आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या विमान कंपनीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करणे कितपत योग्य आहे, असा सवालही केजरीवाल यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय राफेल करारातील सत्य बाहेर आल्यास मोदींना राजीनामा द्यावा लागेल”. असे मतही त्यांनी व्यक्त केले.