दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू, 56 पोलिसांसह 200 जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील दोन दिवसात ईशान्य दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) हिंसाचारात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याची माहिती आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.
सिलमपूरमध्ये परिस्थिती सुधारत आहे. बुधवारी सायंकाळी साडेचारपासून हिंसाचाराची कोणतीही घटना घडली नाही. बाबारपूर, गोकुळपुरी आणि जाफराबाद येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तणावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी रात्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्या भागात आले होते. कारमधून त्यांनी यमुना विहार, भजनपूरा, सिलमपूर, मौजपूर, या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
#WATCH Delhi: National Security Advisor (NSA) Ajit Doval leaves from the office of Deputy Commissioner of Police North-East in Seelampur to review the security situation in different parts of North-East Delhi, on the intervening night of 25-26 February. #DelhiViolence pic.twitter.com/9eJ7IHC92O
— ANI (@ANI) February 25, 2020
जवाहरलाल नेहरू स्टूडंट्स युनियन (JNUSU) चे विद्यार्थी आणि नागरी हक्क समूहाचे लोकांनी दिल्लेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर धरणावर बसले आहेत. दिल्लीतील हिंसाचाराबाबत बैठक आयोजित केली जावी, अशी त्यांची मागणी आहे. ईशान्य दिल्लीत पोलिसांनी दंगेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. या हिंसक निदर्शनात 56 पोलीस जखमी झाले. हिंसाचारात जीव गमावलेल्यांमध्ये दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा समावेश आहे. परिस्थिती लक्षात घेता मौजपूर, झफराबाद, चांदबाग आणि करावलनगरमधील हिंसाचारग्रस्त चार भागात कलम 144 लागू करण्यात आला आहे.
ईशान्य दिल्लीमध्ये सर्व शाळा बंद, बोर्डाच्या परीक्षाही रद्द
उत्तर पूर्व दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बुधवारी बंद राहतील. सिसोदिया यांनी सीबीएसईला बुधवारी होणारी बोर्ड परीक्षा थांबवण्याची विनंती केली आहे. त्यानंतर सीबीएसईने बुधवारी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
24 तासांच्या आत शाह यांची तिसरी बैठक
गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या 24 तासांत तिसरी प्रमुख बैठक घेतली आहे. नवनियुक्त दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) एस. एन. श्रीवास्तवही या बैठकीत होते. गृह मंत्रालयाने परिस्थिती लक्षात घेता प्रभावित भागात दिल्ली पोलिसांसह सीमा सशस्त्र बल (SSB) आणि इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) चे जवान तैनात केले आहेत. तसेच बरोबर प्रत्येक घटनेवर सैनिकसुद्धा लक्ष ठेऊन आहेत.