झारखंडचा पराभव ‘मान्य’ ! दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार स्थापन होणार : अमित शहा
नवी दिल्ली – वृत्तसंस्था – झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर आता दिल्ली निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र, निवडणूक होण्याआधीच दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचा दावा भाजप अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी केला. एवढेच नव्हे तर, पश्चिम बंगालमध्ये भाजप स्पष्ट बहुमतात सरकार स्थापन करणार असा विश्वासही त्यांनीं यावेळी व्यक्त केला.
तर बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत युती करत भाजप निवडणूका लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात अमित शहा यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत झारखंडमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी घेतली. भाजप सरकारने झारखंडमध्येही उत्तम कामगिरी बजावली होती, मात्र काही गोष्टींत आम्ही मागे राहिल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. तरी पराभवाचे कारण शोधून काढू, मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपच सरकार बनवणार असा दावा अमित शहा यांनी केला.
यावेळी शहा यांनी केजरीवाल सरकारवरही जोरदार टीका केली. ‘दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात केजरीवाल सरकारला अपयश आले आहे. जनतेला सर्व काही ठावूक आहे असा इशारा देत, भाजपचेच सरकार स्थापन होणार असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- नियमित खा ‘डोसा आणि सांबर’; हे आहेत 7 आरोग्यदायी फायदे !
- गुलाब पाकळ्यांच्या चहाची वाढती क्रेझ, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्या !
- पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहात ? ‘हे’ 5 उपाय ठरतील फायदेशीर !
- ‘कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ का होतो? जाणून घ्या ९ लक्षणे आणि ६ उपाय
- कोणत्या भाज्या अधिक आरोग्यदायी, ‘हे’ आहेत ६ फायदे
- सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा
- कापूरचे ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या