काँग्रेसच्या मागणीमुळे खाते’वाटप’ रखडलं, आज नक्की होणार पालकमंत्रीपदाचा ‘फॉर्म्युला’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसने आणखी एका खात्याची मागणी केल्याने ठाकरे मंत्रिमंडळाचे खातेवाटप रखडले असल्याचे सांगण्यात येत आहे. खातेवाटपासाठी काल तिन्ही पक्षांची सुमारे ४ तास बैठक झाली. त्यात संपूर्णपणे एकमत झाले नाही. काँग्रेसने कृषी किंवा परिवहन खाते द्या अशी मागणी केल्याने एकमत होऊ शकले नाही. मात्र, त्याचवेळी पालकमंत्रीपदाबाबत एक फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याने तोडगा निघाला आहे.
काँग्रेसची मागणी मान्य न होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत आहे. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार असून आजच खातेवाटप जाहीर करण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाकडे पालकमंत्रीपद असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात पालकमंत्रीपद मागत होती.
पण, त्यातुलनेत त्यांचे आमदार कमी असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अधिक आहेत. त्यामुळे ज्या जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाकडे पालकमंत्रीपद देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी असली तरी विदर्भात अनेक जिल्ह्यात काँग्रेसला पालकमंत्रीपद मिळणार आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- नियमित खा ‘डोसा आणि सांबर’; हे आहेत 7 आरोग्यदायी फायदे !
- गुलाब पाकळ्यांच्या चहाची वाढती क्रेझ, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्या !
- पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहात ? ‘हे’ 5 उपाय ठरतील फायदेशीर !
- ‘कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ का होतो? जाणून घ्या ९ लक्षणे आणि ६ उपाय
- कोणत्या भाज्या अधिक आरोग्यदायी, ‘हे’ आहेत ६ फायदे
- सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा
- कापूरचे ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या