नाभिक समाजाकडून शासनाकडे करण्यात आल्या ‘या’ मागण्या

शिरूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या जवळ जवळ दोन महिन्यांपासुन सलुन व्यवसायाला लाॅक लागले असल्याने हातावर पोट असलेल्या नाभिक समाजाला कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे या प्रश्नाने ग्रासले आहे.रेशनिंगवर धान्य तर मिळते परंतु तेल,मीठ,मसाला कसे आणायचे यांसारख्या मोठ्या अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असुन सरकारने अर्थिक मदत जाहिर करण्याची मागणी नाभिक समाजाकडुन होत आहे.

हातावर पोट असलेल्या सलुन व्यवसायिकांचे कुटंबाचे पालन पोषण हे रोज होणा-या व्यवसायातुन होत असते.परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या अनेक दिवसांपासुन सलुन व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.ग्रमीण भागात व शहरी भागात सलुन व्यवसायीकांच्या काही दुकानात स्वतः एकटेच तर काही दुकानात दोन किंवा चार कामगार काम करत असतात.दुकानात जर एका दिवसाचा पाचशे रूपये व्यवसाय झाल्यास त्यातील संबंधीत कामगाराने केलेल्या कामातुन निम्मे पैसे कामगारास द्यावे लागतात मग त्या पैशावर दुकानदार व कामगार आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवतात.दररोज येणारे ग्राहकांची संख्या निश्चित नसल्याने कधी कधी काही वेळेस संपुर्ण दिवसभरात शंभर रूपयांच्या व्यवसायावरही तडजोड करत कसेबसे सलुन व्यवसायिकांना भागवुन घ्यावे लागत असते.
त्यात ग्रामीण भागात दुकानांना व खोलीला काही प्रमाणात कमी भाडे असले तरी तेथील रोजचा होणारा व्यवसायही कमी असतो आणि भाडे व कुटुंबाच्या पालन पोषनाचा खर्च हा असतोच.शहरी भागात दुकांना व राहत असलेल्या खोलीस भरमसाठ भाडे मोजावे लागत असुन अनेकांनी व्यवसायाच्या आधारावर बँकांकडुन कर्ज घेतलेले असते.कुटुंबात कोणी आजारी असल्यास त्याच्या उपचाराचा खर्च या सर्व अडचणींचा सामना सध्या गेले अनेक दिवसांपासुन व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजाला मोठ्या अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड आहे त्यांना प्रशासनाच्यावतीने रेशनिंग दुकानातुन धान्य तर मिळते परंतु तेल मीठ कसे आणायचे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहत असुन ज्यांचेकडे रेशनिंग कार्ड नाही त्यांचे पुढे ही सध्या कुटुंबातील आई वडील पत्नी व मुलांच पालन पोषन करताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे.एकंदरीतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या अनेक दिवसांपासुन सलुन व्यवसायाच्या दुकानांना लाॅक लागुन असल्याने नाभिक समाजावर कुटुंबाचे पालन पोषन कसे करायचे हा मोठा प्रश्न उभा राहिला असुन सलुन व्यवसायिकांना महिना पाच हजार रूपये मदत करण्याची व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास किंवा लाॅकडाऊन संपल्यानंतर व्यवसायिकांना काम करताना आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षा किट सरकारने द्यावे अशी मागणी नाभिक समाजाकडुन होत आहे.

नाभिक समाजाचा व्यवसाय हा सेवा व्यवसाय असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू असल्याने गेले ५० ते ६० दिवसांपासुन सलुन व्यवसाय बंद असल्यामुळे समाजासमोर रोजी रोटीचा प्रश्न उभा राहिला असुन शासनाने समाजास कर्नाटक राज्याच्या धर्तीवर व्यवसायिकांस प्रत्येकी पाच हजार रूपये महिना अर्थिक मदत करावी,शासनाने २५ लाख रूपयांचे विमा संरक्षण द्यावे,लाॅकडाऊन संपल्यानंतर सलुन व्यवसाय चालु करण्यासाठी शासनाने आरोग्याच्या दृष्टीने व्यवसायिकांना सुरक्षा किट द्यावे,वीज बील माफ करण्यात यावे यांसह विविध मागन्या शासनदरबारी केल्या आहेत.
रमेश नाना राऊत
पुणे जिल्हाध्यक्ष – महाराष्ट्र नाभिक महामंडळ