अरबपतीची पत्नी असूनही ‘ही’ अभिनेत्री जगते साधे जीवन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच आलिशान असे आयुष्य जगत असतात. करिअरमध्ये फार काही होत नसले तर लग्न करून संसारात रमतात आणि एकदम उच्च राहणीमानात आपले आयुष्य एन्जॉय करतात. मात्र सर्वाना अपवाद आहे ती अभिनेत्री दिव्या खोसला कुमार. यशस्वी निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत दिव्याने आपले वर्चस्व निर्माण केले असून ती आज लोकप्रिय बनली आहे.

दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबात दिव्याचा जन्म २० नोव्हेंबर १९८१ ला झाला होता. सुरुवातीपासूनच चित्रपटांबद्दलची असलेल्या आवडीमुळे इंडस्ट्रीमधील करिअरचा शोध घेण्यासाठी दिल्लीहून दिव्या मुंबईत आली. २००४ मध्ये तिने ‘लव्ह टुडे’ या बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण केले. नंतर ती फाल्गुनी पाठक यांच्या ‘अय्यो रामा’ या गाण्यातही दिसली.

त्यानंतर ती अक्षय कुमार आणि बॉबी देओलच्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटादरम्यान गुलशन कुमार यांचा मुलगा आणि टी- सिरीजचा मालक भूषण कुमार याची दिव्याशी भेट झाल्याचे म्हणतात. पहिल्याच भेटीत भूषण कुमार दिव्यावर फिदा झाले होते. हळुहळु दोघांच्या भेटीगाठी होत राहिल्या. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले.

१३ फ्रेबुवारी २००५मध्ये वैष्णो देवी, कटरा येथे दोघांनी लग्न केले. या दाम्पत्याला एक एक मुलगाही आहे, ज्याचे नाव त्यांनी रुहान ठेवले आहे. लग्न केले म्हणून दिव्याने काम करणे सोडले नाही. दिवसेंदिवस आणखीन काही नविन करता येईला का? याच उद्देशाने तिने काही कोर्सही पूर्ण केले. स्वतःला अपडेट करत राहणे खूप गरजेचे आहे असे दिव्या मानते. दिव्याने ‘यारियाँ’सिनेमातून दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शन करण्यास सुरवात केली होती.

भूषण कुमार अब्जाधीश आहेत आणि स्वत: लाखो कोटींची कमाई करतो. पण अब्जाधीशची पत्नी असूनही दिव्याने कधीच श्रीमंतीचा आव आणला नाही. तिचे राहणीमान असो किंवा इतर गोष्टी कधीच त्यात तिने बडेजावपणा केला नाही. राहणीमान, वागणं यातील साधेपणा आजही कायम आहे. सामान्य आयुष्य जगणेच दिव्या जास्त पसंत करते. कोट्यावधी लोक तिचे सौंदर्य आणि साधेपणामुळेच तिच्यावर फिदा असतात.