मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी ठाकरे सरकारची भक्कम तयारी (व्हिडीओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे या संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी (दि.23) दुपारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.
मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी #महाविकासआघाडी सरकारने भक्कम तयारी केली आहे. प्रख्यात विधीज्ञ मुकूल रोहतगी व इतर ज्येष्ठ वकिल मंडळी राज्य शासनाची बाजू मांडणार आहेत. #मराठाआरक्षण टिकले पाहिजे, हीच सर्वांची भूमिका असून, त्याअनुषंगाने सरकार सक्षमपणे काम करते आहे. pic.twitter.com/47gd4enE3P
— Ashok Chavan (@AshokChavanINC) June 23, 2020
यावेळी पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी ठाम विश्वास व्यक्त केला. आजच्या बैठकीला समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. तर विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आजच्या बैठकीला माझ्यासह एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते, तर विजय वडेट्टीवार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने सहभागी झाले. #मराठाआरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा यावेळी आढावा घेतला. pic.twitter.com/JzvoGJVcpv
— Ashok Chavan (@AshokChavanINC) June 23, 2020
पत्रकांना माहिती देताना अशोक चव्हाण म्हणाले, येत्या 7 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधातील मूळ याचिका आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी राज्य शासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे. प्रख्यात विधीज्ज्ञ मुकूल रोहतगी व इतर ज्येष्ठ वकिल महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार आहेत. मुकूल रोहतगी यांच्यासमवेत उपसमितीची बैठक याआधीच झाली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने 1500 पानांची आपली बाजू मांडली आहे. हे आरक्षण टिकले पाहिजे हीच सर्वांची भूमिका असून, त्या अनुषंगाने राज्य शासन अतिशय गांभिर्याने व सक्षमपणे काम करीत असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.