‘या’ फोटोनं आनंद महिंद्रांचं मन जिंकलं, नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॉर्वेचे राजदूत एरिक सोल्हेम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले आरे. हे ट्विट उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या मनाला चांगलेच भिडले आहे. हे ट्विट आनंद महिंद्रा यांना एवढे आवडले की त्यांनी ते रिट्विट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक विनंतीही केली आहे. एरिक सोल्हेम यांनी एका पुलाचा फोटो ट्विट करून विकासासोबत निसर्घाचीही काळजी घेतली जाऊ शकते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच, निसर्गा सोबतच विकास शक्य असल्याचे म्हटले आहे. एरिक सोल्हेम यांनी ट्विटमध्ये पोस्ट केलेला पूल नदरलँड्समधील आहे. या पुलाला ईकॉडक्ट देखील म्हटले जाते. या पुलाचे वैशिष्यम्हणजे ते रस्त्याच्या दुतर्फा जंगलाला एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांना आपला जीव धोक्यात न घालता पुलावरून रस्ता ओलांडता येतो. हा पूल काँक्रीटचा नाही, पण तो हिरवळीने व्यापलेला आहे.
The perfect way to coexist. @nitin_gadkari ji if you can make this a standard feature when building highways through particular zones, we will give you a standing ovation! https://t.co/vEN0FeIcLN
— anand mahindra (@anandmahindra) August 29, 2020
काय म्हणाले आनंद महिंद्रा ?
आनंद महिंद्रा यांनी या पुलाचा फोटो रिट्विट करत विकास आणि निसर्गाचा एकत्र राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे लिहले आहे. तसेच त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली आहे. भारतातही महामार्ग बांधताना याची काळजी घेतली जाऊ शकते का ? जर नितीन गडकरी यांनी असे केले तर त्यांच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवीन, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.
The perfect way to coexist. @nitin_gadkari ji if you can make this a standard feature when building highways through particular zones, we will give you a standing ovation! https://t.co/vEN0FeIcLN
— anand mahindra (@anandmahindra) August 29, 2020
The perfect way to coexist. @nitin_gadkari ji if you can make this a standard feature when building highways through particular zones, we will give you a standing ovation! https://t.co/vEN0FeIcLN
— anand mahindra (@anandmahindra) August 29, 2020
नितीन गडकरींचा रिप्लाय, म्हणाले
आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटला नितीन गडकरी यांनी काही तासात रिप्लाय दिला आहे. आनंद महिंद्रजी आपल्या सल्ल्याबद्दल खूप आभारी आहे. अशा नवनिर्मितीची काळजी आपण घेतली पाहिजे. पार्यावरणीय समतोल राखला पाहिजे, असे गडकरी यांनी म्हटले आहे. याशिवाय जंगलाच्या मध्यभागी महामार्ग बांधताना प्राण्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, याची खबरदारी कशी घेतली जाते हे दर्शविताना नितीन गडकरी यांनी तीन फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये महामार्ग हे पुलासारखे बांधले आहेत. जेणेकरून पुलाखालून वन्य प्राणी सहजपणे इकडून तिकडे जाऊ शकतील.