हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती : डॉ. मोहन भागवत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हिंदू समाज एकत्र येत नाही, त्यांचे एकत्र न येणे ही एक समस्या आहे. हजारो वर्षांपासून हिंदू समाजावर अन्याय होतो आहे. कारण हिंदू समाज आपले मूळ सिद्धांत विसरला. आपल्याला एकत्र येणे आणि एकसंध राहणे ही काळाची गरज आहे. हिंदू समाज एकसंध झाला तरच हिंदूंची प्रगती होईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विश्व हिंदू संमेलनात ते बोलत होते. डॉ. भागवत म्हणाले, हिंदू कोणाचाही विरोध करण्यासाठी जगत नाहीत. हिंदू समाज एकत्र आला आणि तो एकसंध राहिला पाहिजे तरच या समाजाची प्रगती होईल. हिंदू एकजुटीमुळे समाज बांधणीला नवी दिशा मिळेल. हिंदू कधीही कोणाचा विरोध करायचा म्हणून जगत नाहीत. हे खरे आहे की काही लोक आहेत जे हिंदूंना विरोध करतात. असा विरोध होऊ नये म्हणून आपण स्वतः तयारी केली पाहिजे. एकसंध राहिलो तर आपल्या समाजाचे आपण कल्याण करू शकतो. सध्याच्या घडीला सर्वाधिक प्रतिभावान लोक हिंदू समाजातच आहेत असेही मोहन भागवत यांनी म्हटले. या कार्यक्रमात मोहन भागवत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ae3364cc-b31c-11e8-984e-efc6591a240c’]