Devendra Fadnavis | ‘ओबीसी आरक्षणावर ठाकरे सरकारमध्ये बोलके पोपट रोज बोलतात’

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  भारतीय जनता पक्षाकडून (BJP) महाराष्ट्रात ओबीसी जागर (OBC reservation) अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. या शुभारंभावेळी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मार्गदर्शन केले. त्यादरम्यान बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, त्यावेळी मी पुढची 25 वर्ष भाजपमध्ये काम करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीनी (Devendra Fadnavis) स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘समाजातील जे वर्ग उपेक्षित हते अशा लोकांना महत्त्वाची खाती पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे.
मोदींनी सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी OBC आयोगाला संवैधनिक दर्जा दिला.
OBC समाज करता मोठ्या योजना सुरू झाल्या.
अनेक महामंडळाची निर्मिती आमच्या सरकारच्या काळात झाली.
सर्व समाजाला संधी दिल्या शिवाय सर्व देशाचा विकास करता येत नाही हे आमचे ब्रीद वाक्य आहे. OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर हे लोकं खोटे बोलतात.
यांचे बोलके पोपट रोज बोलतात, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray government) निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘आमच्या काळात पन्नास टक्क्यांच्या वरचे आरक्षण टिकलं होतं. या सरकारच्या काळात या सरकारला जे करायचे होते ते केले नाही.
यांनी एक प्रतिज्ञापत्र दिले असते तर सुप्रीम कोर्टाने हवा तेवढा वेळ दिला असता, असं म्हणत फडणवीसांनी OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले.
तसेच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचला तर लक्षात येते की यांनी काहीच न केल्याने सर्वच आरक्षण गेले.
जे काम आम्ही इतके महिने घसा फोडून सांगत होतो तेच आता करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

आता काही लोक म्हणतात मी खोटं बोलतो. पण आरक्षण (Reservations) महाराष्ट्राला गेले.
आता उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या. तिथे आरक्षण मिळाले.
त्यामुळे हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरती लागू झाला, इतकच काय तर काही गावांनी एका दिवसात डाटा दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
तर 2दिवसांपूर्वी फडणवीस आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट झाली.
या भेटीत OBC आरक्षणावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
परवा भुजबळ माझ्याकडे आले होते. मी त्यांना सांगितले की हा माझ्यासाठी राजकीय विषय नाही.
हवी ती मदत करेल. तुमच्या नेतृत्वात करूया, असं ते म्हणाले. दरम्यान, ‘आमची मागणी आहे फेब्रुवारीपर्यंत सर्व गोष्टी झाल्या पाहिजे.
आम्ही पाचही जिल्ह्यात केवळ OBC जागा देऊ. भाजप ओबीसींना आरक्षण परत मिळेपर्यंत थांबणार नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Metro recruitment | मुंबई मेट्रोमध्ये भरती ! इंजिनिअर्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी

Mumbai News | थरारक ! मुंबईत दिवसाढवळ्या वकिलावर तलवारीने सपासप वार, 3 जणांना अटक (व्हिडिओ)

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !