शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, थेट मुघलांशी केली तुलना

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. दरम्यान शिवजंयतीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर टीका केली आहे. फडणवीसांनी ठाकरे सरकारची थेट मुघलांशी तुलना केली आहे. राज्यात राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या कार्यक्रमावर सरकार बंदी आणत नाही. मात्र, शिवजयंती साजरी करताना सरकारकडून कलम 144 लावल जात असल्याची बोचरी टीका त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. तसेच आम्हाला छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत जयंती साजरी होत राहिल असे ते म्हणाले.

नागपूर येथे शिवजयंती उत्सवात फडणवीस सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी राज्य सरकारला संविधानाची आठवण करून दिली. फडणवीस म्हणाले, की ज्यांनी संविधान आणि महाराष्ट्र विधानसभेचे नियम वाचले नाही, तेच अध्यक्ष निवडीवरून राज्यपालांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत आहेत. संविधानात सांगितले आहे, अध्यक्ष निवडीची तारीख राज्यपालाने ठरवून गुप्त मतदान पद्धतीने ती निवडणूक करावी. त्यामुळे माझा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सवाल आहे, की त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संवविधान मान्य आहे की नाही ?. तसेच त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढीवरुनही राज्य सरकारला सुनावले आहे. ठाकरे सरकार जाणीवपूर्वक टॅक्स कमी करत नाही. केंद्र सरकारने कृषीचा सेज पेट्रोल डिझेलवर लावून 3 रुपये टॅक्स कमी केला. मात्र, राज्य सरकार तसे करत नाही त्यामुळे राज्यातील जनतेला पेट्रोल डिझेलसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.