पालकमंत्रीपदाचे अन् बंगल्या-दालनाचे वाद संपल्यानंतर ठाकरे सरकार शेतकर्यांकडे लक्ष देईल : फडणवीस
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकाराला शेतकरी प्रश्नावर घेरण्याची मालिका कायम आहे. राज्यात नव्याने आलेल्या ठाकरे सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, मात्र नेत्यांमध्ये सत्तेसाठी सुरु असलेला वाद संपल्यावर त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार असल्याचा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला. सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सुरु असलेल्या भांडण संपल्यावर त्यांना शेतकऱ्यांंसाठी वेळ मिळणार असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.
यावेळी टीका करताना फडणवीस म्हणाले की राज्यात नवे सरकार आले परंतु या सरकारला शेतकरी, शेती, कारखानदारी, सहकार, फळबाग याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सत्तेत आल्यापासून तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सुरु असलेल्या भांडणामुळे त्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ मिळणार नाही.
When your fights for Govt bungalows, portfolios, offices, guardian ministries are over, will you at least then work for farmers?
बंगले, दालनं, पालकमंत्रीपदं अशी भांडणं संपली की, शेतकर्यांकडे लक्ष देतील का? pic.twitter.com/opEgyH806X— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 14, 2020
फडणवीस म्हणाले की सध्या सरकारमध्ये असलेले नेते बंगले, दालनं, पालकमंत्रीपद यावरुन भांडत असून, हे सर्व वाद पुढील सहा आठ महिन्यात जर मिटली तर त्यानंतर सरकारमध्ये असलेले नेते शेतकऱ्यांकडे वळून पाहतील. तोपर्यंत तरी ते शेतकऱ्यांकडे लक्ष देतील असे वाटत नाही.
फेसबुक पेज लाईक करा –
- झोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके
- ‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा
- रिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके! वेळीच व्हा सावध!
- लाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
- ‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश
- तणावग्रस्त असणार्यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे
- हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा ! जाणून घ्या 6 लक्षणे