अमृता फडणवीस यांच्या ‘त्या’ ट्विटवर देवेंद्र फडणवीसांचा ‘खुलासा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अमृता फडणवीस या गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर सक्रीय झाल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी बोचरी टीका केली होता. यावर शिवसेनेने प्रत्युत्तर देत त्यांना खडे बोल सुनावले होते. काधी नव्हे ते अमृता फडणवीसांनी अतिशय आक्रमकपणे टीका केल्याने राजकीय चर्चेला वेगळी सुरुवात झाली होती. आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला आहे.

भाजपची सत्ता गेल्यानंतर अमृता फडणवीस या ट्विटरवर सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी आता थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला सावरकरांच्या मुद्यावरुन राहुल गांधींवर टीका केली होती. या आधी अमृता फडणवीस फक्त सामाजिक बाबिंवरच ट्विट करत होत्या. मात्र, आता त्यांनी थेटपणे राजकीय विषयांवर टीका करू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राहुल गांधी यांनी माझं अडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे माफी मागणार नाही असे त्यांना एका मेळाव्यात बोलले होते. त्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी फक्त गांधी असून चालत नाही. त्यासारखं काम कराव लागत. त्यानुसार काम केली तरच माणसं मोठी होतात अशी टीका केली होती. या टीकेला आठ दिवसांनी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, खरंय देवेंद्रजी, फक्त ‘ठाकरे’ अडनाव असून सुद्धा कोणी ‘ठाकरे’ होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन प्रामाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

आज देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना अमृता फडणवीस टीका करतात त्याबद्दल काय वटतं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अमृता फडणवीस या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्यांनी काय करावं आणि करु नये हे मी त्यांना सांगत नाही. आणि सांगूनही त्या ऐकतीलच असं नाही असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/