मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला राजीनामा, सत्तास्थापनेचं पुढं काय ?
Share
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तांत्रिक बाब म्हणून फडणवीस यांनी राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. कारण 8 नोव्हेंबरला 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे.
Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and other state ministers meet Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/grmCMrHLg9
8 नोव्हेंबरला 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपेल आणि नवं सरकार स्थापन होईल. परंतू राज्यात सत्ता स्थापनेवरुन भाजप शिवसेनेत पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता काही मिनीटं शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस महत्वाचा आहे.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांना राजीनामा देण्याची गरज नसते.