अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वत:चा अंदाज कायम चुकत आहे. त्यामुळे त्यांनी एखादा चांगला ज्योतिष शोधावा असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. तसेच आता भाजपची अधोगती सुरु झाली असून त्यांना चांगल्या ज्योतिषाची गरज असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले हे सरकार सहा महिन्यापेक्षा अधिक काळ टिकणार नाही. आमच्या 220 पेक्षा अधिक जागा येतील. विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता मिळेल एवढ्या जागा सुद्धा येणार नाहीत. मात्र, फडणवीस यांचे कोणते म्हणणे खरे ठरले नाही. त्यामुळे त्यांनी आता चांगला ज्योतिष शोधावा असा सल्ला थोरातांनी दिला आहे. भाजप अंतर्गत निवडणुकीबद्दल बोलावं, असे माला वाटत नाही. आता त्यांच्या सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यातील वाद सर्व महाराष्ट्र पहात असून भाजपची आता अधोगती सुरु झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, माझ्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आहे. तसेच काँग्रेस विधीमंडळ गटनेता पदही माझ्याकडे आहे. सगळी पदे मलाच मिळाली पाहिजेत अशी माजी भूमिका नाही. त्यामुळे मला पालकमंत्रीपद नको असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी विविध जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे नगरचे पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे मी नाराज असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. हे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- निराश व्यक्तीकडे वेळीच द्या लक्ष, ‘ही’ आहेत 4 लक्षणे, होऊ शकतो मृत्यू
- जास्त मीठाचे आहेत ‘हे’ 8 दुष्परिणाम, दोन हात लांबच राहा !
- मोबाईलचे ‘हे’ 7 दुष्परिणाम माहित आहेत का ? जाणून घ्या किती घातक !
- वृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त ‘ही’ समस्या, या 7 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
- ‘एनर्जी ड्रिंक्स’ चे हे आहेत 4 तोटे, मुलांना अजिबात देऊ नका
- ‘मंकीपॉक्स’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे, वेळीच व्हा सावध !
- अळूची पाने आरोग्यासाठी वरदान! ‘हे’ 7 फायदे जाणून घ्या