अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीमुळे त्यांची युती झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा इगो बाजूला ठेवावा, असा सणसणीत टोला कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर यशोमती ठाकूर या पहिल्यांदाच अमरावतीत आल्या आहेत. त्यांच्या स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत चौफेर फटकेबाजी केली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूप जास्त बोलायची सवय आहे. त्यांच्या या चुकीमुळे शिवसेनेसोबत युती होऊ शकली नाही. त्यांनी आता थोडा इगो बाजूला ठेवला पाहिजे. ते मुख्यमंत्री असताना विरोधात असल्यासारखे बोलत होते. आता त्यांची चिडचिड वाढली आहे. त्यामुळे त्यांनी आपला इगो थोडा बाजूला ठेवावा, असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक स्तरावर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. हे आघाडीचे सरकार असल्याने काही लिमिटेशन आहे. त्यामुळे जे लोक नाराज आहेत, त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांनी त्यांची नाराजी बाजूला सारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी तीनही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना केले आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे आयोजित स्वागत समारंभात यशोमती ठाकूर बोलत होत्या.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- नियमित खा ‘डोसा आणि सांबर’; हे आहेत 7 आरोग्यदायी फायदे !
- गुलाब पाकळ्यांच्या चहाची वाढती क्रेझ, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्या !
- पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहात ? ‘हे’ 5 उपाय ठरतील फायदेशीर !
- ‘कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ का होतो? जाणून घ्या ९ लक्षणे आणि ६ उपाय
- कोणत्या भाज्या अधिक आरोग्यदायी, ‘हे’ आहेत ६ फायदे
- सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा
- कापूरचे ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या