तो ‘सन्मान’ मुख्यमंत्र्यांकडे आहे का ?, देवेंद्र फडणवीसांचा ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूका पार पडल्यानंतर आपण सर्वांनीच भाजप आणि शिवसेनेत रंगलेला कलगीतूरा पाहिला. सर्वात मोठा पक्ष ठरुन देखील मित्र पक्षाने साथ न दिल्याने भाजपला राज्यात सत्तेपासून वंचित राहावे लागले. परंतू या सर्व राजकीय घडामोडी एकीकडे आणि नेत्यांमधील मैत्रीचे संंबंध एकीकडे. कारण नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध अजूनही चांगले आहेत. याचा खुलासा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच उद्धव ठाकरेंना सरकार स्थिरस्थावर करण्यात वेळ देणार असल्याचे सांगत ते म्हणाले की शिवसेनेचे नवे मित्र त्यांनी आधीसारखा सन्मान देत नसल्याची जाणीवही त्यांनी करुन दिली. एका मुलाखतीत त्यांनी राज्यातील विविध घडामोडीवर चर्चा केली. यावेळी त्यांनी शिवसेनेबाबत भूमिका देखील मांडली.

यावेळी फडणवीस म्हणाले की शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार किती दिवस टिकेल हे दाव्याने कुणीच सांगू शकत नाही. मला त्यावर काहीच दावा करायचा नाही. कारण अंतर्विरोधाने भरलेले सरकार देशाच्या इतिहासात कुठेच चाललेले नाही. यावेळी फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला की राष्ट्रवादीचे ठीक आहे, ते कुठेही फिट होतात. सोयीप्रमाणे कुठलीही भूमिका घेतात. पण, शिवसेना आणि काँग्रेस हा केवढा अंतर्विरोध आहे बघा. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची अनेक भाषणे आज व्हायरल होत आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसबद्दल जी मते मांडली आहेत, ती ऐकल्यावर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणे यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते?

परंतू शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येईल का यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. परंतू ते पुढे म्हणाले की भाजप आणि शिवसेनेची युती ही नैसर्गिक युती होती. शिवसेना दूर गेली आम्ही नाही गेलो. महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना किती अपमानित व्हावे लागेल हे त्यांच्या नक्की लक्षात येईल. आमच्यासोबत असताना उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा जो सन्मान होता, तो आज आहे का? त्यांना कुणासोबत बसावे लागत आहे, कुठे कुठे जाऊन चर्चा कराव्या लागता आहेत, काय-काय सहन करावे लागतंय. आमच्यावेळी मातोश्रीवरुन आदेश निघायचा आणि आम्ही तो मान्य करायचो असे ही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही माझे मित्र आहात, या सरकारला काही दिवसांचा वेळ दिला पाहिजे, असे मला उद्धव ठाकरेंनी सांगितले. मी तो वेळ देणार आहे. काही दिवस चुकीचे निर्णय होतील, जनतेच्या विरोधातील निर्णय होतील त्यावर टीका नक्की करेन. वेळ जरुर घ्या, पण जनहिताचे निर्णय घ्या. ठराविक काळानंतर ते होत नसेल तर मी धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही. माझा डीएनए विरोधी पक्षाचाच आहे. सरकार स्थापन झाल्यापासून निगेटिव्ह निर्णयाशिवाय यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. खातेवाटप नाही, मंत्रिमंडळ विस्तार नाही. म्हणजेच, वेळेचा सदुपयोग केला जात नाही.

पंतप्रधानांना रिसीव्ह करण्यासाठी ते आले होते तेव्हा उद्धव ठाकरेंशी गप्पा झाल्या. राजकीय दृष्या भूमिका जरी बदलली असेल तरी वैयक्तिक संबंध त्यांनी किंवा मी संपवले नाहीत असे ही सांगत त्यांनी त्यांच्या मैत्रीवर भाष्य केले.

Visit : Policenama.com