Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘आमच्या पराभवाचं विश्लेषण…’ (व्हिडिओ)

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत (Karnataka Election Result 2023) भाजपचा (BJP) दारुण पराभव झाला असून काँग्रेस (Congress) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. कार्नाटक निकालावर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी हा पराभव भाजपच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याची टीका (Maharashtra Politics News) केली होती. राज ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही आमच्या पराभवाचं विश्लेश्ण आम्ही करु. त्यासाठी आम्हाला कोणाची गरज नसल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आमच्या पराभवाचं विश्लेषण आम्ही करु. त्यासाठी आम्हाला कोणाची गरज नाही. (Maharashtra Politics News) आम्ही अनेक निवडणुका जिंकतो, काही निवडणुका आम्ही हरतो, आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे. याचं कारण मोदींवर (PM Narendra Modi) लोकांचा असलेला विश्वास. कधी कधी स्थानिक ठिकाणी अशा अडचणी तयार होतात ज्यामुळे एखादी निवडणूक हरावी लागते, त्याचं विश्लेषण होईल.

 

 

काय म्हणाले राज ठाकरे?

हा पराभव भाजपच्या (BJP) स्वभावाचा आणि वागणुकीचा आहे. आपलं कोण वाकडं करु शकतो अशा विचारात जो असतो त्याचा पराभव आहे, असं मला वाटतं. भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकरलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते.

 

 

घरात बसून स्वप्न बघितल्यावर…

घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो.
जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचा प्रभाव असेल,
तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा (Aam Aadmi Party) विजय आणि काँग्रेसचा (Congress) पराभव का झाला? जालंधरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव नव्हता का? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणीत भाजपला यश आले. मग त्याठिकाणी भारत जोडो यात्रेचा प्रभाव नव्हता का?यावर राज ठाकरे बोलतील का?
असा सवाल उपस्थित करत आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
तसेच राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तत्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देत असून त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही फार महत्त्व देत नाही,
असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis’s reply to Raj Thackeray’s criticism, said- ‘Analysis of our defeat…’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akola Riots | ‘दंगलीची माहिती पोलिसांना…’, अकोला दंगलीवरुन राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप;
देवेंद्र फडणवीसांकडे केली ‘ही’ मागणी