बीड : पोलीसनामा ऑनलाईन – आमच्या दोन्ही भगिनी एक खासदार तर एक पालकमंत्री आहे. कुणी पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना त्यांच्या वडिलांसारखे राजकीय प्रश्न कळतात , असे नाही..! असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्यावर टीका केली आहे . केवळ माझे बाबा असे म्हटल्याने मतं पक्की होत नाहीत , असेही ते म्हणाले . इतकेच नाही तर , तुमच्या वडिलांच्या नावाने काढलेलं महामंडळ रद्द केले तरी तुम्ही सत्तेला चिटकून बसला आहात . माझ्यासारखा अशा सत्तेला लात मारून निघून गेला असता . अशा शब्दात सडकून टीकाही त्यांनी केली आहे.
बीडच्या जनतेने एका घराला भरभरुन दिले मात्र बीडकरांना काय मिळाले? निवडून आल्यानंतर पाच वर्षात एकदाही दिसल्या नाहीत. पोटी जन्म घेतला म्हणून राजकीय प्रश्न कळतातच असं नाही. म्हणूनच आता शेतकऱ्यांशी नाळ जोडलेला व्यक्तीच बीडचा खासदार होणार. #LokSabhaElections2019 @NCPspeaks pic.twitter.com/O8I6vJQlF8
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 16, 2019
बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते . यावेळी त्यांनी प्रीतम आणि पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली . यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, “एवढं सगळं तुम्ही भरभरून दिलं मात्र तुम्हाला काय मिळालं . 2004 ची पुनरावृत्ती पुन्हा 2019 ला होणार आहे . बीडचा उमेदवार सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे” असे ते म्हणाले.
‘मला त्यांची कीव येते’
पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, “दबंग खासदार म्हणजे दादागिरी करणारे खासदार असे नाव आमच्या बहिणीला कुणीतरी ‘दबंग’ नाव दिले , मला त्यांची कीव येते . दोन्ही बहिणींना एवढाच प्रश्न आहे की, तुमच्या कारकिर्दीत शेजारच्या लातूरला रेल्वे डब्बा बनवण्याचा कारखाना झाला तुम्ही काय केले ?” असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
पालकमंत्री, खासदार, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत यांचे सरकार असताना पाटोदा तालुक्याच्या जनतेला काय मिळालं? गेल्या पाच वर्षात ऊसतोड कामगारांचे कोणतेच प्रश्न सोडवले गेले नाही. स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड मजुरांचे महामंडळ काढण्याची घोषणा केली तीही पूर्ण केली नाही. pic.twitter.com/EthGBoxJMg
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 16, 2019
भाजपावर निशाणा साधताना मुंडे म्हणाले की, ” भाजपही आमची मॅच फिक्सिंग आहे असं सांगत आहे. परंतु आमचा उमेदवार मॅच विनिंग आहे . जर हे राजकारण जनावरांच्या छावणीत करत असतील तर त्यांची पातळी किती खालावली आहे हे दिसून येते ” असा आरोपही मुंडे यांनी केला आहे . कर्तृत्वाने अमरसिंह पंडित मोठे असतील तरी बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिली , असे ते बीड लोकसभेच्या उमेदवारीवरुन बोलताना म्हणाले.
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या म्हणून विक्रमी मतांनी निवडून येऊन निधी खर्च करताना बीडच्या खासदारांनी निच्चांक गाठला. बीडच्या कितीतरी गावांत खासदारांचा निधी पोहोचलाच नाही. एवढी दबंगाई होती तर १० हजार कोटींचा प्रकल्प लातूरला कसा जाऊ दिला? #LokSabhaElections2019 pic.twitter.com/6GPLO3Dahb
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 16, 2019
..तर मग कर्जमाफी कशी मिळणार ?
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही आपली तोफ डागली . मुंडे म्हणाले की, “शेतकऱ्याला बायकोसोबत ऑनलाइन कर्जमाफीसाठी का बोलवता ? याविषयी मुख्यमंत्र्यांनाही मी बोललो. जर शेतकऱ्याचे बायकोसोबत भांडण झाले असेल आणि बायको सोबत यायला तयार नसेल तर मग कर्जमाफी कशी मिळणार ? असा सवाल मुंडे यांनी केला.
बीडचे लोकसभेचे उमेदवार बजरंग (बाप्पा) सोनावणे यांच्या प्रचारार्थ बुथ कमिटीच्या पाटोदा येथील मेळाव्यास उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बजरंग सोनवणेंसारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. आणि आम्हाला विश्वास आहे की आमचा उमेदवार ‘मॅच विनर’ आहे. pic.twitter.com/GCNgCG0sh3
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 16, 2019