बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीने विधानसभेची तयारी म्हणून शिवस्वराज्य यात्रेच्या दुसरा टप्प्यात पाथरी येथे भव्य सभा घेतली. त्यावेळी धनजंय मुंडेनी उपस्थितांना अशिर्वाद देण्याचे भावनिक आवाहन करताना सांगतिले की, आगामी विधानसभा माझ्यासाठी जीवन मरणाची आहे. मागील 24 वर्षात आम्ही तुमची प्रामाणिक सेवा केली. सर्वांच्या सुख दु:खात सहभागी झालो. हात अखडता घेतला नाही. 100 एकरची जमीन विकून तुमची सेवा केली, लेकीला दोनवेळी अशिर्वाद दिला, यंदा लेकाला आशिर्वाद द्या.
सत्तेत नसतानाही आदरणीय @PawarSpeaks साहेब आपल्यासाठी झिजतायत. एका हाकेत या परळीकरांसाठी सिमेंटची कंपनी आणली, ८० मेगावॅटचा प्रकल्प, ५०० कोटींची गुंतवणुक आणली. या मातीचं मी देण लागतो. आपल्या माणसाशी इमान राखातोय. तुमच्या उत्कर्षासाठीच पवार साहेबांचा आदर्श ठेवत कार्य करतोय. pic.twitter.com/933JFmUVpt
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 23, 2019
गोपीनाथ मुंडेंची इच्छा अपूर्ण –
गोपीनाथ मुंडेंची इच्छा अपूर्ण राहिली असे म्हणताना ते म्हणाले, परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच वाण धरण कोरडे पडले आणि परळीची दशा झाली. जायकवाडीचे पाणी धरणात यावे ही स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची इच्छा होती. त्यांच्या वारसदारांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता दिली. मात्र ना जायकवाडीचे पाणी आले, ना वाण धरणाची उंची वाढली. परळीत एमआयडीसीसाठी मी प्रयत्न केले मात्र सत्ता असून आणि उद्योगपतींशी ओळख असून पालकमंत्र्यांना माझ्या भावांसाठी रोजगार आणता आला नाहीत, अशी सडकून टीका मुंडे यांनी पालकमंत्र्यांवर केली.
पंकजा मुंडेंना सवाल –
परळीत व्यवसाय का आणले नाहीत असे सवाल धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना विचारला. यावेळी ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री असताना परळीत पंचतारांकित वसाहत उभारण्यासाठी दिवंगत मुंडेंनी प्रयत्न केले. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. पण सिरसाळात 2200 एकर जमीन उपलब्ध असल्याचे पत्र आपण उद्योगमंत्र्यांना दिले. अधिकारी पाहणीसाठी आल्यानंतर आमच्या ताईंना लक्षात आला, त्यांच्या अनेक उद्योगपतींची ओळख आहे.
- ‘या’ नैसर्गिक पद्धतीने वाढू शकते तुमची लैंगिक क्षमता
- अंडकोषात वेदना होण्याची ‘ही’ कारणे असू शकतात
- काही सेकंदातच जखमेचा ‘रक्तस्त्राव’ थांबवण्यासाठी करा हे ६ घरगुती उपाय
- तुम्ही तोंडासंबंधी ‘या’ चुका करता का ? होऊ शकतात या समस्या, वेळीच व्हा सावध !
- अनेक आजारांवर रामबाण उपाय ‘हरड’, नियमित सेवन केल्याने दूर राहतील आजार
- तुळशीचे पाणी अशाप्रकारे पिल्यास होतील अनेक फायदे, ‘हा’ उपाय करून बघा
- विवाहित महिला का घालतात जोडवे ? आरोग्याचे ‘हे’ होतात ३ फायदे