आधी गिरणी कामगारांचं वाटोळं केलं आता बेस्ट कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावू नका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप गेल्या 7 दिवसांपासून सुरु आहे. विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर येथील परिवर्तन यात्रेच्या सभेत ते बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःच्या ताब्यातील बेस्ट व्यवस्थित चालवून दाखवावी मग राज्याबाबत गप्पा माराव्यात, अशी घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी केली. त्यानंतर आधी गिरणी कामगारांचं वाटोळं केलंत आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप करू नका ! असा टोमणाही त्यांनी यावेळी मारला. मुंबईची मानबिंदू आणि जगातली सर्वोत्तम सार्वजनिक परिवहन सेवा समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच संप ७ दिवसांपर्यंत लांबला. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. राज्यकर्त्या सेना-भाजपाचा मात्र पटका पटकीचा खेळ सुरू आहे. मुंबईकरांचे यांना काहीच घेणेदेणे नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःच्या ताब्यातील बेस्ट व्यवस्थित चालवून दाखवावी मग राज्याबाबत गप्पा माराव्यात. आधी गिरणी कामगारांचं वाटोळं केलंत आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप करू नका!, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, संत भगवान बाबांची मुर्ती जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या माथेफिरूला तातडीने बेड्या ठोका. त्या माथेफिरूची ओळख पटलेली आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिस कशाची वाट पाहत आहेत ?  त्याच्यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.