दहीहंडीचा पहिला बळी ; धारावीतील वीसवर्षीय गाेविंदाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

दहीहंडीच्या थरावर चढत असताना भोवळ येऊन बेशुद्ध पडलेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धारावीत राहणाऱ्या कुश खंदारे (वय-२० रा.राम गोपाळ चाळ, धारावी) असे मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे. बाळ गोपाळ मंडळातर्फे धारावीत दुपारी दहीहंडी फोडण्यासाठी थर रचले जात होते त्यावेळी हा प्रकार घडला.
[amazon_link asins=’B07B6SN496,B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’91b13165-af85-11e8-ad95-99397a4ae8fc’]

मुंबईत दहीहंडीचा उत्सव साजरा करताना आत्तापर्यंत८६ गोविंदा जखमी झाले आहेत. ४० गोविंदांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर २० जणांना उपचार करुन सोडून देण्यात आलं आहे. सायन, केईएम, नायर, रहेजा, भाभा, राजावाडी या रुग्णालयांमध्ये गोविंदांवर उपचार सुरु आहेत.

जाहिरात

दहीहंडीचा सराव करताना जखमी झालेल्या १४ वर्षीय चिराग पटेकर या गोविंदाला मुंबईतील भाजप आमदार आशिष शेलार यांच्याकडून एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. चिराग पटेकरवर खार इथल्या होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्साहात साजरी झाली. ठाण्यात मध्यरात्री मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी महिला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

जाहिरात