औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच कोल्हापूर सांगली भागात येऊन गेलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले आहेत. आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायला पुरग्रस्तांच्या मदतीला अनेक हात समोर येत आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने शक्य ती मदत पूरग्रस्तांना देण्यासाठी समोर येत आहे.
जेहुर आडगाव येथील रहिवासी धीरज चव्हाण हे मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी पदी आहेत. प्रशासकीय सेवेत नुकत्याच रुजू झालेल्या या अधिकाऱ्याने आपल्या साखरपुड्याचा खर्च वाचवून आणि मित्र परिवारातून जमलेल्या एकूण रकमेतून १०३ पूरग्रस्त कुटुंबीयांना मदत केली आहे. स्वतःच्या साखरपुड्यातून १० हजार आणि मित्रांकडून ३० हजार रुपये जमा करून हरिपूर येथील १०३ पूरबाधित कुटुंबांना भांडी वाटप केली.
आम्ही पूरग्रस्तांना केलेली मदत अल्प होती. त्यांना संसार पुन्हा उभारण्यासाठी आणखी मदतीची गरज आहे. परंतु, आम्ही दिलेल्या मदतीमुळे पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर समाधान होते. तसेच आम्हाला देखील मदत केल्याचा आनंद झाल्याचे धीरज चव्हाण यांनी सांगितले. हरिपूर गावातील १५० कुटूंबियांची घरे पुरामुळे उद्धवस्थ झाली आहेत.
- गरोदर महिलांच्या ‘या’ सवयीमुळे मुलं बनतील स्मार्ट आणि इंटेलीजेंट
- रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण
- झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन
- हाय ब्लडप्रेशरला करा बायबाय, नाष्ट्यापूर्वी खावेत ३ खजूर, होतील ‘हे’ फायदे
- सिगारेटचा शरीरावर असा होतो गंभीर परिणाम, शरीराच्या ७ भागांना असतो धोका!
- चहा पिण्याच्या ‘या’ पध्दतीमुळे होऊ शकतो जीवघेणा आजार, रिसर्चमध्ये खुलासा ; जाणून घ्या
- मूळव्याधीची ‘ही’आहेत ६ कारणे, हे सोपे ११ उपाय केल्यास मिळेल आराम
- अंगावर शहारे का येतात ? शरीरातील ‘या’ बदलांची ‘ही’ आहेत कारणे
- गरोदरपणात नियमित करा ‘या’ ५ गोष्टी, होईल नॉर्मल डिलेव्हरी
- गाजरचा ज्यूस प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे, आरोग्य राहील ठणठणीत, जाणून घ्या