किरकोळ वादातून वृद्ध शेतकऱ्याला बेदम मारहाण

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शेतातून जाण्याच्या कारणावरून शेतकऱ्यांमध्ये वाद झाला असून मारहाणीत एक शेतकरी जखमी झाले आहे. या प्रकरणी शेतकरी रविंद्र माळी यांनी पोलीसांत तक्रार केली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, शेतकरी रविंद्र दौलत माळी हे खंडलाय गावात शेती करतात. तेथून जवळच असलेल्या बाबुर्ले गावात प्रकाश शिंदे राहतात.  शिंदे याचे शेता जवळच काही अतंरावर सावर्जनिक वहिवाटने ऱविंद्र माळी यांना शेतीकडे जाण्याकरीता वाट आहे. गंगाराम त्र्यंबक पाटील यांचे शेताजवळुन जाताना प्रकाश शिंदे यांनी माळी यांना या रस्त्याने जायचे नाही म्हणत धमकावले. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर शिंदे यांनी माळी यांच्या वडिलांना काठीने बेदम मारहण केली. या प्रकरणी माळी यांनी पोलीसांत तक्रार केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.