Coronavirus : संक्रमित शीख तीर्थयात्रींमुळं पंजाबमध्ये ‘टेन्शन’, दिग्विजय सिंह म्हणाले – ‘तबलिगी मरकजसोबत काही तुलना ?’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबमध्ये मोठ्या संख्येने शीख यात्रेकरूंना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, शीख यात्रेकरूंना कोरोना संसर्ग झाल्यामुळे पंजाब एक धोका निर्माण झाला आहे. याची तुलना तबलिगी मरकजशी केली जाऊ शकते का ? दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर एका वृत्त वाहिनीचे ट्विट सामायिक करून प्रश्न उपस्थित केला की, शीख तीर्थ यात्रेकरूंची तुलना तबलीगी मरकज प्रकरणाशी करता येईल का
शनिवारी रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील नांदेड येथूल परत आलेल्या शीख भाविकांमुळे पंजाबमध्ये कोरोनाची आकडेवारी झपाट्याने वाढली आहे. पंजाबमध्ये कोरोना बाधित लोकांची संख्या वाढून 780 झाली आहे. यापैकी मागील 72 तासांत कोरोनाचे 400 प्रकरण वाढले असून त्यापैकी 391 यात्रेकरू नांदेडहून आले आहेत.
Coronavirus: Sikh pilgrims pose fresh Covid-19 threat in Punjab – India News
Any comparison with Tablighi Markaz? https://t.co/WaSvaZQ6g5
— digvijaya singh (@digvijaya_28) May 3, 2020
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही कबूल केले की, राज्यात कोरोना संसर्गाच्या मोठ्या प्रमाणात शीख यात्रेकरूंचा समावेश आहे. अमरिंदर सिंह यांनी शनिवारी सांगितले की, कोरोना पंजाबमध्ये तीन वाटेनी आला. पहिल्यांदा एनआरआय, दुसरा नांदेड, आणि तिसरा राजस्थान आणि इतर राज्यातील लोक. त्यांनी सांगितले की सुरुवातीला पंजाबने कोरोना संक्रमणावर मात केली होती, परंतु नांदेड व इतर ठिकाणांवरून आलेल्या लोकांमुळे संसर्ग पसरला आहे.
तबलीगी जमात चर्चेत
दरम्यान, मार्चमध्ये देशभरातून लोक दिल्लीत तबलीगी जमातच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जमले होते. त्यात काही परदेशीही होते. त्याचवेळी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आणि निजामुद्दीनमधील तबलीगी जमात कार्यालयात बरेच लोक अडकले होते. यामध्ये बऱ्याच लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. देशाच्या इतर भागांतून आलेल्या तबलीगी जमातमधील लोकांनाही या आजाराने ग्रासले. काहींचा मृत्यूही झाला. या विषयावर बरीच खळबळ उडाली होती.