‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील रेश्मा म्हणजेच सखी गोखले बरेच काही ……

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

झी मराठी ची सर्वात प्रसिद्ध मालिका आणि तरुणांच्या मनात ठासून भरलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे सखी गोखले हे नाव अगदी घराघरात पोहोचले आहे. सखी ने या मालिकेतील रेश्माची केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. सुजय, आशू, अॅना, मीनल, रेश्मा आणि कैवल्य या सहा मित्रांवर मालिकेचे कथानक आधारित होते. यानंतर ‘ती दिल दोस्ती दोबारा’ या मालिकेत देखील मुख्य भूमिकेत सखी आपल्याला पाहायला मिळाली होती. ती टीव्ही मालिकेबरोबर अनेक नाटकांत सुद्धा काम केले आहे. ‘अमर फोटो स्टुडिओ ‘ या नाटकात देखील तिने काम केले आहे. या नाटकातील तिचा अभिनय विशेष होता. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या पूर्वी सखीने एका चित्रपटात काम केले होते. पण ती त्या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली नाही तितकी ती दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे प्रसिद्ध झाली.
[amazon_link asins=’B00HP6LMPE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95fdec8c-922d-11e8-907d-61519f8256d8′]
‘रंगरेज’ हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटामध्ये तिने वेणू या नावाची एक व्यक्तिरेखा साकारली होती. या वेणूची भूमिका तिने चॅन साकारली होती. पण त्यावेळी सखीच्या नावाची तितकीशी चर्चा झाली नव्हती.कि त्यावेळी तिला म्हणावी इतकी प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. सखी ही प्रसिद्ध अभिनेता मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची मुलगी आहे. तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी फोटोग्राफीमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. पुण्याच्या भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफीमधून फॅशन आणि फाईन आर्ट्स फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले आहे.

सखीचे वडील मोहन गोखले हे एक प्रसिद्ध अभिनेते होते. आणि आई शुभांगी गोखले या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, नाटकांमध्ये ,मालिकांमध्ये काम केले आहे.सखीचे वडील मोहन गोखले यांचे वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. हे राम या चित्रपटाचे चेन्नईत चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी शूटिंगच्या वेळेत त्यांना अटॅक आला होता चित्रपटाचे दिग्दर्शन कमल हासन हे करत होते.चित्रीकरणासाठी मोहन गोखले तिथे गेले होते. पण २९ एप्रिल १९९९ला त्यांचे तिथेच निधन झाले. त्यावेळी सखी केवळ सहा वर्षांची होती. मोहन गोखले यांनी ‘माफीचा साक्षीदार’, ‘आज झाले मुक्त मी’, ‘कैरी’ अशा अनेक मराठी सिनेमात आणि ‘स्पर्श’, ‘आदत से मजबूर’, ‘मिर्च मसाला’, ‘हिरो हिरालाल’ या हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. सखीची आई शुभांगी गोखले यांनी तिला लहानाचे मोठे केले आणि सखीला आई-वडील दोघांचेही प्रेम दिले. शुभांगी गोखले यांनी आत्मकथा या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवरील त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी आजवर ‘लापतागंज’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘काहे दिया परदेस’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.