देशाला ‘वन नेशन वन इलेक्शन’ची गरज, त्यावर गंभीर चर्चा आवश्यक : PM मोदी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आज पुन्हा एकदा देशाच्या प्रगतीसाठी देशाला “वन नेशन वन इलेक्शन’ची गरज असल्याचं भाष्य केलं. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी अखिल भारतीय पीठासन अधिकाऱ्यांच्या संमेलनालात उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मोदी म्हणाले, की “वन नेशन वन इलेक्शन’ बद्दल गांभीर्याने विचारमंथन आवश्यक आहे. “वन नेशन वन इलेक्शन’ केवळ विचार मंथनाचा विषय नाही ही देशाची गरज आहे आता आपल्याकडे काही महिन्यांनी देशात कुठे ना कुठे निवडणूक होत असतात. त्यामुळे विकासकामांमध्ये अडथळा येतो. देशाच्या प्रगतीचा वेग मंदावतो. याबद्दल आपण गांभीर्याने विचार करायला हवा, असे मत मोदींनी यावेळी मांडलं. आपल्या मतदारयाद्यावर आपण पैसा वेळ खर्च करतोय असा सवाल उपस्थित करत लोकसभा-विधानसभा आणि अन्य निवडणुकांसाठी केवळ एका मतदार यादीचा वापर व्हायला हवा असं ही ते यावेळी म्हटलं.

यावेळी पंतप्रधानांनी देशातल्या जनतेला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, “संविधानाच्या निर्मितीत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारी आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून संविधान तयार करण्यात हातभार लावलेल्या प्रत्येकाला मी नमन करतो. त्यामुळे देशाला संविधान मिळालं. पूज्य बापूंकडून मिळणारी प्रेरणा आणि सरदार पटेल यांची वचनबद्धता यांना प्रणाम करण्याचा आजचा दिवस आहे. ”

२६/११ ला श्रद्धांजली

“आजच्या दिवशी बारा वर्षांपूर्वी देशावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. परदेशातून आलेले लोक मारले गेले. त्यांना मी श्रद्धांजली वाहतो.”