‘या’ कारणामुळे ‘भारत’नंतर दिशा पाटनी सलमानसोबत काम करणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- अभिनेत्री दिशा पाटनी सध्या भारत सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती सलमान खान सोबत झळकणार आहे. परंतु तु्म्हाला कदाचित खोटे वाटेल परंतु एका इंटरव्ह्यूमध्ये दिशा म्हणाली की, ती आता भविष्यात सलमान खान सोबत काम नाही करू शकणार.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिशा म्हणाली की, “अली सरांनी मला एका भूमिकेसाठी बोलावले, जी स्पेशल अपीयरंससाठी खूप काही आहे. मी त्यांना ऐकले आणि सलमानसोबत काम करायचे असल्याने मी लगेच होकार दिला. मला माहीत नाही की, भविष्यात कधी मला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळेल. हेच काय तर अली सरांनीही मला स्किप्ट ऐकवताना हे सांगितले.”

दिशाला यामागचे कारण विचारल्यावर दिशा म्हणाली की, “साहजिक आहे की, आमच्यात वयाचे खूप मोठे अंतर आहे. भारत या सिनेमात ठिक आहे कारण या सिनेमात सलमान तरुण वयात दाखवण्यात आला आहे. ते खरंच खूप अद्भूत व्यक्तिमत्त्व आहे. तो खूपच मेहनती आहे. मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे. एका बाजूला भारत खूप स्पेशल आहे कारण मी असा सिनेमा कधीच केला नव्हता. त्यामुळे त्यांना असे वाटत आहे की सलमानसोबत दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मला मिळणार नाही.”

सलनानसोबत काम करून आपण खूप आनंदी आहोत हे सांगताना दिशा म्हणाली की, “मला चांगलं वाटत आहे की लोकं मला सलमानसोबत पाहणार आहेत. आमच्या खूप चांगली केमिस्ट्री आहे. मला कधीच असे काही होईल असं वाटलं नव्हतं. सलमानसोबत काम करून मी खूप लकी असल्याची भावना मला वाटत आहे. कोरियोग्राफर आणि अली सरांचेही आभार.”