जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरीकांना सतर्कतेचे आव्हान.

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव व धुळे जिल्ह्यात दिनांक 26/9/ 2019 रोजी वीज व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता हवामान विभाग, कुलाबा मुंबई यांनी वर्तविली आहे म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना निवेदन करण्यात येते की, जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच जिल्ह्यातील सर्व धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने अतिवृष्टीमुळे नदीपात्रामध्ये व नाल्यांमध्ये पाणी वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे नदी व नाल्याकाठच्या नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी घ्यावी. नदी पात्रात जाऊ नये. पुलावरुन पाणी वाहत असताना पुल ओलांडु नये.

असे आव्हान आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे. वतीने करण्यात आले आहे.