कोरेगाव भीमा : गतवर्षीच्या जाणवलेल्या त्रुटी दूर केल्या, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती
१० हजार पोलिसांचा बंदोबस्त१० हजार पोलिसांचा बंदोबस्त
वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) – गेल्यावर्षी बिनदिक्कतपणे पार पडलेल्या विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमात पार्किंग, पाणी, टॉयलेट, स्ट्रीट लाईट्स कमतरता, परतीच्या प्रवासातील कोंडी आदी जाणवलेल्या त्रुटी प्रशासनाने यावर्षीच्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीमध्ये दूर केल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी १० हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्तंभ परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी व महानिरीक्षक यांनी पूर्व तयारीची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हापरिषद व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले कि, गेल्यावर्षी भाविकांना सोयीसुविधा व सुरक्षा पुरविण्यासाठी विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमात प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीन केलेल्या सकारात्मक कामांच्या धर्तीवरच यावर्षीसुद्धा मागील दोन महिन्यापासून प्रशासन काम करीत असून गेल्यावर्षी जाणवलेल्या त्रुटी यावर्षी दूर करण्यात आल्या आहे. प्रशासनाने यावर्षी लोणीकंद ते शिक्रापूरपर्यंत जवळपास २५० एकर जागेवर १५ पार्किंग यार्ड्स बनविले असून १५ हजार फोर व्हीलर, ३ हजार बसेस, १० हजार टू व्हीलर्स बसतील अशी व्यवस्था असणार आहे. पार्किंग यार्ड्सपासून स्तंभपरिसराच्या कामापर्यंत भाविकांची ने-आण करण्यासाठी गेल्यावर्षीपेक्षा ५० अधिक बसेस वाढविण्यात आल्या आहे. संध्याकाळनंतर स्तंभपरिसरात हायमास्ट व स्ट्रीट लाईट्सची व्यवस्था, रॅम्पची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.
गेल्यावर्षीपेक्षा अधिक ३० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याबरोबरच गेल्यावर्षीपेक्षा २०० टॉयलेट अधिक उपलब्ध असणार आहेत. अग्निशमन दलाच्या १३ गाड्या सज्ज राहणार असून सर्व सुविधायुक्त ३० ॲम्बुलंस, ओपीडी सेंटर नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील. २६० पेक्षा अधिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांसोबतदेखील सकारात्मक चर्चा करून शांतता बैठकांद्वारे जातीय सलोखा राखण्याचे काम केले आहे. पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख गावांमध्ये दारू विक्री बंद करून शाळांना सुट्टी देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी सांगितले कि, यावर्षी ३७ पोलीस युनिटस मधील १० हजार पोलिसांचा बंदोबस्त व समता सैनिक दलाचे जवान मानवंदना कार्यक्रमासाठी तैनात असणार आहेत. गेल्यावर्षी परतीच्या प्रवासावेळी झालेली कोंडी सोडविण्यासाठी देखील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लोणीकंद ते शिक्रापूरपर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद करून पर्यायी मार्ग वाहनचालकांसाठी उपलब्ध असणार आहेत. लोणीकंद ते शिक्रापूर पर्यंतचा परिसर ३०० च्यावर सीसीटीव्ही व ड्रोनच्या कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली असणार आहे. परंपरेनुसार होणाऱ्या ८ ते ९ सभांनाच परवानगी देण्यात आली आहे. ७४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून सोशल मिडीयावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिकांच्या मदतीने एकोप्याचे वातावरण तयार करण्यात आले असल्यामुळे भाविकांनी स्तंभास अभिवादन करण्यासाठी यावे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- 8 तासांपेक्षा जास्त झोप घेता ? ‘या’ 4 प्रकारे जीवाला होऊ शकतो धोका !
- ‘या’ 4 पदार्थांचा आहारात समावेश केला तर वाढेल स्मरणशक्ती !
- ‘अॅसिडिटी’मुळे आहात हैराण ? करा ‘हे’ 4 घरगुती उपाय
- चुकूनही ‘या’ 5 छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा पडू शकतं महागात !
- उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ ९ उपाय करा ! जाणून घ्या
- हसण्याचे ‘हे’ आहेत ७ फायदे, ‘हार्टअटॅक’चा धोकाही होतो कमी
- सावधान ! पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरल्यास होतात ‘हे’ 4 धोके