युतीबाबत बोलण्याचा तिघांनाच ‘अधिकार’, महाजनांचा सेनेच्या रावतेंना ‘टोला’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – १४४ जागा न दिल्यास युती तुटणार या दिवाकर रावते यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी युतीबाबत बोलण्याचा फक्त तिघांना अधिकार आहे, असे सांगून रावते यांना टोला लगावला आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली असताना शिवसेना भाजपामधील युतीबाबत दररोज उलटसुलट बातम्या येत आहे. याबाबत परिवहन मंत्री दिवाकार रावते यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी शिवसेनेला १४४ जागा न मिळाल्यास युती तुटण्याची शक्यता असून आम्हीही २८८ जागा लढविण्यास तयार आहोत, असे सांगितले होते.
दिवाकर रावते यांच्या विधानावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, युती १०० टक्के होणार आहे. युतीबाबतचे सर्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि फडणवीस यांनाच युतीबाबत बोलण्याचा अधिकार आहे. युतीबाबत ८० टक्के बोलणी यशस्वी झाली आहे. त्याबाबत जे काही सांगायचे ते हे तीन नेते सांगतील, असा टोला मारला आहे.
Visit – policenama.com
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा