भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार मारले ? याबाबत चर्चा नको …! 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार मारले , याबाबच चर्चा व्हायला नको . असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे . पुलमावा हल्ल्याबाबत मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचेही त्यांनी म्हटले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे . दरम्यान काही दिवसांपूर्वी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक संदर्भात बोलतांना पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त करण्याचा सल्ला मीच मोदी सरकारला दिला होता . असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते . दरम्यान केंद्र सरकारने पुलवामा घटनेनंतर दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती . या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठिशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला . त्यात माझाही सहभाग होता . काल मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला . मात्र तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे . मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची संमती होती , असे बोललो होते . असेही त्यांनी म्हंटले .

इतकेच नव्हे तर , आपणा सर्वांना भारतीय सैन्याचा अभिमान आहे . भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे . १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे . त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिर मधील अतिरेक्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले , याची चर्चा व्हायला नको . लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये, आपणा सर्वांना भारतीय सैन्याचा अभिमान आहे . भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे . १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे . त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिर मधील अतिरेक्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले, याची चर्चा व्हायला नको .  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये , असे माझे मत आहे . असे शरद पवार यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवर लिहिले आहे.