पोलिसांनी ‘डायरेक्ट’ पत्रव्यवहार करू नये, पोलीस महासंचालकाचा अधिकाऱ्यांना ‘आदेश’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी खात्यातील कारभारात सुधारणा व पारदर्शपणा आणण्यासाठी विविध उपाय योजना राबवित आहेत. याचाच भाग म्हणून घटकप्रमुखांकडून येणाऱ्या पत्र व्यवहारामध्ये अचुकता आणण्यासाठी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक निर्णय घेतला आहे. थेटपणे पत्रव्यवहार न करता संबंधित वरिष्ठांच्यामर्फत पाठवायची आहेत. त्याशिवाय येणाऱ्या पत्रांची दखल घेतली जाणार नाही, असे पोलीस महासंचालकांनी म्हटले आहे.
राज्यभरातील विविध पोलीस घटकांकडून मुख्यालयात पाठविण्यात येणाऱ्या विविध स्वरुपाचे पत्रव्यवहार आणि अहवालाच्या सादरीकरणाबाबत पोलीस महासंचालकांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. थेट संपर्क न साधता संबंधित आयुक्त, विशेष महानिरीक्षक कार्यालयामार्फत पाठवायचा आहे. त्याशिवाय आलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी असल्याची शक्यता असते. त्रिटी निदर्शनास आल्यास त्यांच्या स्तरावर त्यामध्ये बदल केले जाऊ शकतो.
संबंधीत वरिष्ठांकडून त्रटीमध्ये बदल केल्यानंतर मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जावू शकतात. त्यामुशे संबंधित विषयातील त्रुटी दूर होऊ शकतात, त्यामुळे पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पोलिसांना थेट पत्रव्यवहार करता येणार नाही.
Visit : Policenama.com
- जगण्याचे ‘हे’ सूत्र जाणून घ्या, ‘या’ ४ गोष्टी लक्षात ठेवल्या तर मिळेल आनंद
- जिममध्ये नुसता घाम गाळू नका, प्रथम जाणून घ्या कोणत्याही ‘व्यायामाची त्रिसुत्री’
- हिवाळ्यात ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी; दुर्लक्ष करणे ठरू शकते घातक
- अयोग्य ‘ट्रेनर’मुळे होते आरोग्याचे नुकसान, ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा
- पांढरे केस, अकाली टक्कल हृदयरोगासाठी कारणीभूत, प्रयोगातील ‘हे’ ६ निष्कर्ष
- भरकटलेले जीवन यशस्वी करायचेय ? ‘हा’ आहे ‘पासवर्ड’, या ३ स्टेप्स आवश्यक
- हिवाळ्यात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी नियमित करा सेवन
- गरोदर महिलांनी खावेत भिजवलेले बदाम, होतील ‘हे’ ६ आरोग्यासाठी फायदे