दिवाळीत फटाके फोडू नका, CM ठाकरे यांचे जनतेला आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील कोरोनाचा आकडा आता नियंत्रणात आला आहे. मात्र धोका टळलेला नाही. प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दिवाळीत शक्यतो फटाके वाजवू नका,( dont-firecrackers-diwali) असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief-minister-uddhav-thackeray) यांनी जनतेला केले आहे. मुंबई आणि राज्यातील कोरोना नियंत्रणात येतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये जे कमावले आहे ते चार दिवसांच्या
धुरात वाहून जाऊ देऊ नका, असे आवाहन देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित करताना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत आपण गणपती, नवरात्र असे सण साजरे केले. खरेतर हे सण साजरे केले की पार पाडले हा प्रश्नच आहे. अनलॉक होत असल्याने गर्दी वाढत आहे. गर्दी ही जिवंतपणाचं लक्षण आहे. मात्र अद्याप धोका टळलेला नाही. दिल्लीत कोरोनाचा आकडा वाढत आहे. पाश्चिमात्य देशातही कोरोना वाढत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे कोरोना वाढल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. त्यातून कोरोनाचा धोका वाढतो.

त्यामुळे दिवाळीत फटाके फोडण्याबाबत काय निर्णय़ घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र मी बंदी वगैरे घालणार नाही. मात्र शक्यतो दिवाळीत फटाके फोडू नका. प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका असे ते म्हणाले.