तुम्हालाही जेवनानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे ? मग जरा थांबा आधी ‘हे’ वाचा

पोलीसनामा ऑनलाईनः जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी घातक असून अनेक गंभीर आजाराचा धोका होऊ शकतो. म्हणून जेवल्यानंतर कमीत कमी अर्धा तास थांबून मगच पाणी सेवन करावे. जेवल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये, याची माहिती आज देणार आहोत. तसेच निरोगी आणि फिट राहण्यासाठी पाण्याचे सेवन कधी करवे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

पचनक्रिया कमकुवत होतेः जेवल्यानंतर लगेच पाणी सेवन करत असल्यास पचनासंबंधित समस्यांचा धोका असतो. पाचन प्रणाली मजबूत ठेवण्यासाठी, खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानेच पाण्याचे सेवन करावे.

वजन वाढतेः अन्न खाल्ल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन केल्यास वजन वाढू शकते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, जेवणाच्या दोन तास आधी पाणी प्या.

मधुमेही रुग्णांसाठी धोकादायक  : जेवणानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांना धोकादायक ठरू शकते. जेवणानंतर ताबडतोब पाणी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

अल्सरः जेवणानंतर लगेच पाण्याचे पाणी प्यायल्याने अल्सर होण्याची शक्यता असते. खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे गॅस आणि आम्लतेची समस्या देखील उद्भवू शकते. आपण जे अन्न खातो ते बेंबीच्या डाव्या बाजूला असलेल्या जठारात जाऊन पचन क्रिया होते. जठराग्नी खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नी ही पचन क्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.

पाणी पिण्याची योग्य वेळः
सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानेतर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिडहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवाने राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडते. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. )