रेखा-अमिताभच्या वागण्यामुळे त्रस्त झालेल्या रंजीत यांनी ‘या’ व्यक्तीकडे केली तक्रार

पोलीसनामा ऑनलाईनः बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेली जाणारी लव्हस्टोरी म्हणजे अमिताभ बच्चन व रेखा यांची लव्हस्टोरी होय. दोघेही एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण कालांतराने ही जोडी दुभंगली गेली. पण या लव्हस्टोरीचे किस्से मात्र आजही चवीने वाचले जातात. असाच एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे.

एका वृत्तानुसार, रेखा व अमिताभ दोघेही बराच वेळ एकत्र घालवत असत. पण त्यांच्या याच भेटीगाठी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते रंजीत यांच्यासाठी डोकेदुखी ठरली होती. रंजीत यांनी रेखा व धर्मेन्द्र यांना घेऊन एक सिनेमा बनवणार होते. या सिनेमाचे नाव होते, कारनामा, त्याचे शूटींगही सुरु झाले होते.

याचदरम्यान रंजीत यांनी संध्याकाळचे शूटींग शेड्यूल ठेवले. पण संध्याकाळचे शेड्यूल रेखा यांना मान्य नव्हते. कारण काय तर रेखा यांचा संध्याकाळचा वेळ फक्त आणि फक्त अमिताभ यांच्यासाठी राखीव होता. या वेळात रेखा यांना अमिताभ यांच्याशिवाय दुसरे काहीही नको होते. मग काय, रेखांनी रंजीत यांना शूटींगची वेळ बदलण्याची मागणी केली. पण रंजीत यांनी ही मागणी अमान्य केली आणि रेखा भडकल्या. त्यांनी थेट शूटींगला येण्यास नकार दिला. हा किस्सा खुद्द रंजीत यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता.

तर रेखा मानायला तयार नव्हत्या आणि रंजीत शूटींग शेड्यूल बदलण्यास तयार नव्हते. एकंदरीत दोघातील तणाव वाढला. रेखा काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. मात्र रंजीत यांना त्यांचा सिनेमा पूर्ण करायचा होता. अखेर वैतागून ते धर्मेन्द्र यांच्याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या त्यांना सांगितली. रंजीत यांचे सगळे ऐकून घेतल्यानंतर धर्मेन्द्र यांनी काय करावे तर रंजीत यांना चित्रपटातून रेखा यांच्याजागी नवी हिरोईन घेण्याचा सल्ला दिला. हा सल्ला रंजीत यांनी मानला आणि त्यांनी रेखा यांच्या जागी फराहची निवड करून ‘कारनामा पूर्ण केला. विशेष म्हणजे, रंजीत यांनी केवळ फराहला नाही तर धर्मेन्द्र यांच्या जागी विनोद खन्ना यांना घेऊन सिनेमा पूर्ण केला.