व्यापारी संबंध तोडल्याने भारताला ‘काडी’चा देखील फरक पडणार नाही, पाकिस्तानला कोट्यावधीचं ‘नुकसान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा केली. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारावर याचा परिणाम होणार असून भारत किंवा पाकिस्तान कुणाला याचा जास्त फटका बसणार हे पुढे पाहुयात

भारताचे काहीही नुकसान होणार नाही
व्यापार बंद करण्याच्या पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारताला काहीही तोटा होणार नसून मागील तीन वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा बंद आहे. जवळपास १८ हजार कोटी रुपयांचा व्यापार दोन्ही देशांमध्ये होत होता. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापार झाला नव्हता. त्यामुळे भारतावर काहीही परिणाम होणार नसून पाकिस्तानमध्ये मात्र दैनंदिन वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढणार असून महागाई देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यामध्ये कांदे, टोमॅटो आणि केमिकल्सचा समावेश आहे. या सगळ्या गोष्टी भारतामधून मोठ्या प्रमाणावर आयात करत असतो.

या वस्तूंची होते सध्या आयात निर्यात
भारत आणि पाकिस्तनमध्ये सध्या साखर, चहा पावडर, कापूस, रबर, तेल, यांसारख्या प्रमुख वस्तूंसह १४ वस्तू निर्यात होतात. त्याचबरोबर भारत पाकिस्तानकडून एकूण १९ वस्तूची आयात करत असून यामध्ये पेरू, आंबे, अननस, साइक्लिक हाइड्रोकॉर्बन, पेट्रोलियम गॅस, पोर्टलॅंड सीमेंट, कॉपर वेस्‍ट, कॉटन यॉर्न यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.

आता काय होणार
२०१८-१९ मध्ये जुलै ते जानेवारी या महिन्यांमधील भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार थोडा वाढून १. १२२ अरब रुपयांपर्यन्त पोहोचला होता. भारताची २०१५-१६ मधील भारताचा पाकिस्तानबरोबर व्यापार हा ६४१ अरब डॉलरचा झाला होता तर पाकिस्तानचा केवळ २. ६७ अरब डॉलरचा होता. त्यामुळे पाकिस्तानच्या या निर्णयामुळे त्यांना सर्वात जास्त तोटा होणार असून भारताला याचा काहीही फरक पडणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त