इंडोनेशियात भूकंपा सोबतच त्सुनामीच्या लाटांचा तडाखा 

जकार्ता : वृत्तसंस्ठा
इंडोनेशियाच्या पालू आणि दोंगाला शहराला सुलावेसी बेटावर 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे त्सुनामीच्या लाटांचा चांगलाच तडाखा बसला आहे. भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमध्ये जवळपास ४०० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. तर शेकडो जण जखमी आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, इंडोनेशियामध्ये छोटे-मोठे भूकंप नेहमीच होत असतात.मात्र यावेळेस दोंगालापासून ५६ किलोमीटर अंतरावर १० किलोमीटर जमिनीच्या आत भूकंपाचे केंद्र होते. या ठिकणाहून 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा झटका बसला यामुळे 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्याने त्याठिकाणी त्सुनामीमी आली. यामध्ये बरेच नुकसान झाले, दरम्यान नागरिकांनी उंच ठिकाणांवर जाण्यासाठी धाव घेतली. लवकरात लवकर उंच ठिकाणी पोहोचता यावे यासाठी नागरिकांना गाड्यांची मदत घेतली. त्यामुळे शहराच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c86271f0-c3e2-11e8-b22c-f73980bc2fea’]
इंडोनेशियाच्या आपत्तीव्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुलावेसी द्वीपवर आलेल्या भूकंपानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे जवळपास 400 जणांना मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जखमींना दाखल करण्यात येत आहे. या जखमींवर उपचार करणं हे डॉक्टरांसमोर मोठं आव्हान आहे.
विशेष म्हणजे  डिसेंबर २००४ मध्ये इंडोनेशियाच्या सुमात्रामध्ये ९३ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. या भूकंपानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीचा अनेक देशांना फटका बसला होता.
[amazon_link asins=’B00V0II33M,B079SW6HB5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f086c73c-c3e2-11e8-8cfd-c1b061f661e1′]
यामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जीवितहानी झाली होती. या त्सुनामीमध्ये हिंद महासागरातील क्षेत्रातील देशांमध्ये जवळपास 2,20,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

जाहिरात