नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. दिल्ली एनसीआरसरह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सदर भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक लोक घर आणि कार्यालये सोडून बाहेर पडले आहेत. आपापल्या परीने जीव वाचवण्याचे सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानातील रावळपिंडी या ठिकाणी असून आज दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत असे समजत आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे समजत आहे. या भूकंपाची तीव्रता जास्त होती. हा भूकंप 6.1 रिश्टर स्केल इतका होता.
हरियाणा, पंजाब, दिल्ली, काश्मीर, हिमाचल प्रदेशातील वेगवेगळ्या भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत अशी माहिती आहे. या भूकंपात जीवितहानी झालेली नसली तरी, तीव्रता जास्त असल्याने किती घरांचे नुकसान झाले आहे याची माहिती प्रशासनाकडून अद्याप देण्यात आलेली नाही.
Visit : policenama.com
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय