नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या विविध भागात सातत्याने भूकंप होत आहेत. शुक्रवारी देशात तीन भूकंप झाले. हरियाणा आणि मेघालयनंतर तिसरा भूकंप लडाखमध्ये झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या म्हणण्यानुसार, लडाख भूकंपातील भूकंपाचे केंद्र कारगिलपासून 200 किमी लांब उत्तर-पश्चिमेत होते. शुक्रवारी रात्री 8:15 वाजता आलेल्या या भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी होती. मात्र, यात कोणत्याही जीवितहानीची खबर अद्याप तरी आलेली नाही. याआधी सायंकाळी मेघालयातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
मागील काही दिवसांपूर्वी मिझोरममध्ये झालेल्या भूकंपानंतर मेघालय येथे देखील शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी मेघालयातील तुरा येथून पश्चिमेस 79 किमी लांब याचे केंद्र होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल वर 3.3 मोजली गेली. मात्र, या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. शुक्रवारी हरियाणा आणि दिल्लीच्या हद्दीतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र रोहतक होते. हा भूकंप दुपारी 3.32 वाजता आला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी मोजली गेली.
An earthquake of magnitude 4.5 on the Richter scale hit 200 km north-west of Kargil, Ladakh: National Center for Seismology
— ANI (@ANI) June 26, 2020
यावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीबाबत कुठलीही सूचना मिळाली नसली तरी धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. त्याचबरोबर दिल्ली-एनसीआर भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि वैज्ञानिकही त्याबद्दल चिंतेत आहेत.
An earthquake of magnitude 3.3 on the Richter scale hit 79 km west of Tura, Meghalaya: National Center for Seismology
— ANI (@ANI) June 26, 2020
मंगळवारी मिझोरममध्ये 3.7 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की मंगळवारी जाणवलेल्या धक्क्यामुळे राज्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. त्यांनी सांगितले की राजधानी ऐझॉलमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.