नंदुरबार :पोलीसनामा ऑनलाईन
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागात दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 3. 7 रिश्टर स्केल असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. अचानक धक्के बसायला लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे सर्वाधिक धक्के गुजरातच्या सूरतमधील नवसारी, तापी वलसाड भागात जाणवले.तर महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नंदुरबार जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.