लॉकडाऊन 5.0 बाबत ठाकरे सरकारकडून दिशानिर्देश जाहीर, 3 टप्प्यांमध्ये उघडणार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. लॉकडाऊन 4.0 आज रात्री 12 वाजता संपणार असून उद्यापासून 1 जून पासून लॉकडाऊन 5.0 लागू होणार आहे. तो 30 जून पर्यंत लागू राहणार आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारने शनिवारी दिशानिर्देश जाहीर केले होते. दरम्यान, ठाकरे सरकारनं लॉकडाऊन 5.0 बाबत आज (रविवार) दिशानिर्देश जाहीर केले आहेत. लॉकडाऊन 5.0 मध्ये 3 टप्पे करण्यात आले आहेत. 3 जून, 5 जून आणि 8 जून पासून लॉकडाऊन 5.0 उघडणार आहे. त्यासंदर्भातील नियमावली राज्य सरकारनं जाहीर केली आहे.
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.#MissionBeginAgain pic.twitter.com/PSX16PYrzQ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 31, 2020
Guidelines for Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.#MissionBeginAgain pic.twitter.com/mBG5CW1o47
— Policenama (@Policenama1) May 31, 2020
पहिला टप्पा : 3 जून पासून – यामध्ये पहाटे 5 ते सायंकाळी 7 दरम्यान वैयक्तिरित्या सायकलिंग, जॉगिंग, रनिंग करता येणार आहे. सार्वजनिक आणि खासगी क्रीडांगणावर या गोष्टी करता येणार आहेत.
Guidelines for Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.#MissionBeginAgain pic.twitter.com/pqCZWMgHNk
— Policenama (@Policenama1) May 31, 2020
दुसरा टप्पा : 5 जून पासून – मॉल आणि मार्केट कॉम्पलेक्स सोडून इतर बाजारपेठा उघडल्या जाणार असून त्या काही अटी व शर्तींवर सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान चालू राहणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारनं पी-1 आणि पी-2 चं नियोजन केलं आहे. दरम्यान, 5 जून पासून नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी आणि दुचाकींचा वापर करण्यासाठी काही अटी व शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये चालक आणि 2 व्यक्ती, रिक्षामध्ये चालक आणि दोन व्यक्ती, चारचाकीमध्ये चालक आणि 2 व्यक्ती तर दुचाकीवर केवळ एकानेच प्रवास करावा असे सांगण्यात आले आहे
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.#MissionBeginAgain pic.twitter.com/3JJrWIWV4J
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 31, 2020
तिसरा टप्पा : 8 जून पासून – सर्व खासगी कार्यालये उघडण्यास परवानगी दिली आहे मात्र कर्मचार्यांची संख्या केवळ 10 टक्के ठेवावी असे देखील सांगण्यात आले आहे. त्यासाठी देखील काही अटी सरकारनं घातल्या आहेत. दरम्यान, या टप्प्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकीवर एकजण प्रवास करू शकणार आहे तर तीन चाकी मध्ये चालक आणि इतर 2 व्यक्ती आणि चारचाकीमध्ये देखील चालक आणि इतर दोन व्यक्ती प्रवास करू शकणार आहेत.
Guidelines for Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.#MissionBeginAgain pic.twitter.com/M7u9udKF2J
— Policenama (@Policenama1) May 31, 2020
हे प्रतिबंधित (बंदच) असणार – शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण, कोचिंग हे पुढील आदेशापर्यंत बंदच असणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंदच. सामाजिक, राजकीय, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. स्पा, सलून, ब्युटी पार्लर बंदच. शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स बंदच. पुढील आदेशापर्यंत या सर्व गोष्टी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.#MissionBeginAgain pic.twitter.com/gmHZQJemum
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 31, 2020