भारतीय सैन्यांकडून चीनला ‘इशारा’ ! आम्हाला 1962 चं सैन्य समजू नये, ‘डोकलाम’ आठवावं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सैन्याने चीनला कडक इशारा दिला आहे. ईस्टर्न आर्मी कमांडचे लेफ्टनंट जनरल एमएम नरवणे यांनी म्हटले आहे की, आता आम्ही 1962 चे सैन्य नाही. चीन आम्हाला इतिहास आठवायला सांगत असेल तर आम्हीही त्यांना हेच सांगू. कोलकात्यामध्ये भारत चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आपल्या सीमांची सुरक्षा’ या परिसंवादात ते बोलत होते.
लेफ्टनंट जनरल एम.एम. नरवणे म्हणाले की, ‘1962 च्या युद्धाला आम्ही सैन्यावरील काळे निशाण म्हणून पाहत नाही. सर्व सैन्याच्या तुकड्यांनी चांगला लढा दिला आणि नेमून दिलेली कामे पूर्ण केली. डोकलाम वादाच्या वेळी भारतीय सैन्याने चीनपेक्षा जास्त वेळा LAC पार केला. जर चीनने 100 वेळा एलएसी ओलांडली तर आम्ही एलएसी 200 वेळा ओलांडला.
चीन हाच डोकलाम वादाचा भाग बनला. पण भारताने त्यास अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर दिले. यावरून हेच दिसून येते की आम्ही आता कोणतेही आव्हान स्वीकारण्यास सक्षम आहोत. चीनला वाटले की दादागिरी करून आम्ही निघून जाऊ मात्र आम्ही त्यांचा मुकाबला केला. भारतीय सैन्यदल कोणत्याही शत्रूशी लढण्यास सक्षम आहे. त्यांनी दोन नव्या चौक्या तयार केल्या आम्हीही त्या ठिकाणी दोन नव्या चौक्या उभारल्या. ‘
Head of Eastern Army Command Lieutenant General MM Naravane: It was China which was caught unprepared in the Dokalam standoff. They thought they would get away by being a regional bully, but we stood up to the bully. It shows that we are capable of taking on any threat. pic.twitter.com/trdN3qfFhQ
— ANI (@ANI) August 27, 2019
2017 मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलामवरून दोन महिन्यांहून अधिक काळ संघर्ष सुरू होता. डोकलाम प्रदेश सिक्किमजवळील भारत-चीन-भूतान त्रिकूटावर आहे. हा भाग भूतानच्या हद्दीत येतो, परंतु चीन हा डोंगलाँग प्रांत असल्याचा दावा करतो.
- ‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार
- बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार
- द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्ट करा ‘हे’ १० पदार्थ
- शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे
- गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!
- गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या
- कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्या
- हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर