Health Tips: ‘दही’ आणि ‘केळी’ रिकाम्या पोटी खाणं खूपच ‘धोकादायक’, होऊ शकतं गंभीर ‘नुकसान’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : योग्य आहार घेण्याच्या सवयीमुळे चांगले आरोग्य प्राप्त होते. आपण सर्वजण खाण्यापिण्याच्या अनेक नियमांचे पालन करतो. पण तुम्हाला हे माहित असावे की अशा काही गोष्टी आहेत ज्या कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत. जर त्यांना रिकाम्या पोटी खाल्ले तर शरीराला नुकसान पोहोचते.

अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या रिकाम्या पोटी खाऊ नयेत –

– सोडा कधीही रिकाम्या पोटी घेऊ नये. सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोनेट अ‍ॅसिड असते. सोडा रिकाम्या पोटी प्यायल्याने मळमळ होऊ शकते आणि आपण अस्वस्थ होऊ शकता.

– मसालेदार अन्न असेही आरोग्यासाठी चांगले नसते. परंतु हे कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. यात नॅचरल अ‍ॅसिड असते जे पोटाचे पचन खराब करते. कधीकधी पोटात कळ देखील निर्माण होते.

– रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन करणे सर्वात घातक आहे. त्यात कॅफिन असते जे रिकाम्या पोटी घेतल्याने आपल्याला त्रासदायक ठरू शकते.

– कॉफी प्रमाणेच चहा देखील रिकाम्या पोटी पिऊ नये. चहामध्ये जास्त प्रमाणात अ‍ॅसिड असते, ज्यामुळे पोटात वेदना निर्माण होऊ शकतात.

– दही आरोग्यासाठी खूप चांगले असते, परंतु जर रिकाम्या पोटी दही खाल्ले तर नुकसान पोहोचवू शकते. रिकाम्या पोटी दही खाणे, पोटदुखीसाठी जबाबदार ठरू शकते.

– केळीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत. केळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढते. यामुळे शरीरात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण असंतुलित होते. या कारणास्तव, सकाळी रिकाम्या पोटी केळी खाऊ नये.

– रताळ्यामध्ये टॅनिन आणि पेक्टिन असते ज्यास रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस्ट्रिक अ‍ॅसिडची समस्या उद्भवते. यामुळे छातीत जळजळ देखील होऊ शकते.